शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

पाणी नव्हे विष !

By admin | Updated: June 21, 2014 23:49 IST

करडी येथे नळाच्या दूषित पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. गावात विविध आजारांची सुरु झालेली साथ अजूनही पूर्णत: आटोक्यात आलेली नाही. हगवण, उलटी, कावीळ, ताप आदी

दूषित पाण्याचा पुरवठा सुरुच : तत्काळ उपाययोजनेची गरजकरडी (पालोरा) : करडी येथे नळाच्या दूषित पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. गावात विविध आजारांची सुरु झालेली साथ अजूनही पूर्णत: आटोक्यात आलेली नाही. हगवण, उलटी, कावीळ, ताप आदी जलजन्य आजाराचे रुग्ण अजूनही गावात आढळून येत आहेत. नागरिक नळाचे पाणी पिण्यास घाबरतात. एवढी दहशत नळाचे पाण्याने निर्माण केली आहे. दूषित पाण्याच्या प्रकोपाला दोषी कोण, याचा तपास आरोग्य विभागाने केला असला तरी उपाययोजना मात्र तोकड्याच आहेत. करडी हे परिसरातील महत्वाचे बाजारपेठेचे गाव असून २७ गावांचा थेट संपर्क या गावाशी येतो. खरेदी व्यवहार असो की आरोग्य सुविधा, कोणत्याही गोष्टीसाठी करडी गावाशिवाय पर्याय नाही. मात्र करडी गावात येण्यास परिसरातील नागरिक घाबरत आहेत. दुकानदारांनी पिण्याचे पाणी हाती दिल्यास पाणी कुठले आहे, नळाचे तर नाही याची विचारणा अगोदर केली जाते. त्यातच गावात विविध आजाराची साथ असल्याने लहान मुले घेऊन गावात येण्याचे बरेचदा टाळले जात आहे. नागरिकांंमध्ये पिण्याच्या पाण्याने प्रथम प्रचंड दहशत निर्माण केली आहे. पाण्याचे महत्त्व आज नागरिकांमध्ये पदोपदी जाणवत आहे. पाणी म्हणजे जीवन ही शिकवण आज समजली आहे. करडी येथे आजही दूषित पाण्याचा पुरवठा सुरु असल्याची माहिती नागरिकांनी दिली. अहवालात पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. जलजन्य आजाराचे रुग्ण आजही गावात दिसून येत आहेत. त्यासाठी तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे. दूषित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याला दोषी कोण असा आजही नागरिकांकडून विचारला जात असला तरी जि.प. आरोग्य विभागाने दोषी कोण याचा खुलासा झालेला असल्याने आता उपाययोजना महत्त्वाची, असा सूरही नागरिकांमधून येत आहे. (वार्ताहर)