शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

४० चौरस मीटर जागेसाठी अकृषक परवानगीची आवश्यकता नाही

By admin | Updated: June 22, 2014 23:55 IST

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४२ (२) मधील नवीन सुधारणानुसार ग्रामीण भागात शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचे जे ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नाही

भंडारा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४२ (२) मधील नवीन सुधारणानुसार ग्रामीण भागात शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचे जे ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नाही ते वैयक्तीक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनात रूपांतर करण्यासाठी अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही. तसेच अशा जागेमध्ये लघु वाणिज्यक उपक्रमांसाठी सुद्धा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. यासाठी कलम ११७ (५ अ) नुसार अकृषिक आकारणी लागू नाही.या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अनागरी भागातील वैयक्तिक निवासी वापराखालील इमारतीमधील वाणिज्य वापरास अकृषिक परवानगी घेण्यामधून सूट याबाबत १३ सप्टेंबर २०१२ रोजी शासन निर्णय जाहीर केलेले आहे.त्या अन्वये नगरेतर क्षेत्रातील कोणत्याही शेतजमिनीचा वापर वैयक्तीक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनासाठी करता येईल. नगरेतर क्षेत्रात वैयक्तिक खऱ्याखुऱ्या वापराखालील असलेल्या अशा जागामध्ये ४० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ नसलेल्या जागेत सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम राबविता येतील. यामध्ये छोटे दुकान, पिठाची गिरणी, किराणा दुकान, कांडप मशीन या सारख्या सुक्ष्म उपक्रमांकरिता अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे.परंतु सुक्ष्म उपक्रमाकरिता आणि अशा लघु वाणिज्यक प्रयोजनाकरिता जागांचा वापर करणारी व ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नसलेले क्षेत्र अशा उद्देशासाठी व्यापरणारी व्यक्ती, ज्या दिनांकास जमिनीच्या वापरात अशा बदल करीत त्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत, विहीत करण्यात येईल, अशी नमुन्यात ग्राम अधिकाऱ्यामार्फत तहसीलदाराला असा बदल केल्याच्या दिनांकाची सूचना देईल. तसेच इतर माहिती सादर करील आणि त्याची एक प्रत जिल्हाधिकाऱ्याला देखील अग्रेषित करील.अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)