शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

४० चौरस मीटर जागेसाठी अकृषक परवानगीची आवश्यकता नाही

By admin | Updated: June 22, 2014 23:55 IST

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४२ (२) मधील नवीन सुधारणानुसार ग्रामीण भागात शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचे जे ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नाही

भंडारा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४२ (२) मधील नवीन सुधारणानुसार ग्रामीण भागात शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचे जे ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नाही ते वैयक्तीक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनात रूपांतर करण्यासाठी अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही. तसेच अशा जागेमध्ये लघु वाणिज्यक उपक्रमांसाठी सुद्धा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. यासाठी कलम ११७ (५ अ) नुसार अकृषिक आकारणी लागू नाही.या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अनागरी भागातील वैयक्तिक निवासी वापराखालील इमारतीमधील वाणिज्य वापरास अकृषिक परवानगी घेण्यामधून सूट याबाबत १३ सप्टेंबर २०१२ रोजी शासन निर्णय जाहीर केलेले आहे.त्या अन्वये नगरेतर क्षेत्रातील कोणत्याही शेतजमिनीचा वापर वैयक्तीक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनासाठी करता येईल. नगरेतर क्षेत्रात वैयक्तिक खऱ्याखुऱ्या वापराखालील असलेल्या अशा जागामध्ये ४० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ नसलेल्या जागेत सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम राबविता येतील. यामध्ये छोटे दुकान, पिठाची गिरणी, किराणा दुकान, कांडप मशीन या सारख्या सुक्ष्म उपक्रमांकरिता अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे.परंतु सुक्ष्म उपक्रमाकरिता आणि अशा लघु वाणिज्यक प्रयोजनाकरिता जागांचा वापर करणारी व ४० चौरस मीटरपेक्षा अधिक नसलेले क्षेत्र अशा उद्देशासाठी व्यापरणारी व्यक्ती, ज्या दिनांकास जमिनीच्या वापरात अशा बदल करीत त्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत, विहीत करण्यात येईल, अशी नमुन्यात ग्राम अधिकाऱ्यामार्फत तहसीलदाराला असा बदल केल्याच्या दिनांकाची सूचना देईल. तसेच इतर माहिती सादर करील आणि त्याची एक प्रत जिल्हाधिकाऱ्याला देखील अग्रेषित करील.अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)