शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

न्यु इंडिया इंशुरन्सला ३४ हजारांचा दंड

By admin | Updated: August 1, 2014 00:08 IST

मोहाडी तालुक्यातील वरठी येथील कृपाशंकर पांडे यांनी गाडी घेतली होती. तिला अपघात झाल्याने त्याचा दावा देण्यास न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीने व बँक आॅफ इंडियाने टाळाटाळ केली.

ग्राहक मंचचा निर्णय : बँक व्यवस्थापकालाही ठोठावला दंड भंडारा : मोहाडी तालुक्यातील वरठी येथील कृपाशंकर पांडे यांनी गाडी घेतली होती. तिला अपघात झाल्याने त्याचा दावा देण्यास न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीने व बँक आॅफ इंडियाने टाळाटाळ केली. तर बँक आॅफ इंडियाने धनादेश अनादर झाल्याची बाब पुढे केल्याने या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सर्व पुरावे तपासल्यानंतर विमा कंपनी तथा बँकेला नुकसान भरपाई म्हणून दंड सुनावला आहे. ग्राहक मंचने दिलेल्या या निर्णयाने विमा कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे. वरठी येथील सनफ्लॅग वसाहतीत राहणारे कृपाशंकर उर्फ शालीकराम पांडे यांनी मे. आॅटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि. नागपूर येथून २०१० मध्ये एम.एच. ३६ एच १०७४ क्रमांकाची नवीन अल्टो कार विकत घेतली होती. या गाडीचा त्यांनी न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनी नागपूर विमा केला होता. विम्याच्या रकमेसाठी त्यांनी बँक आॅफ इंडिया वरठी शाखेचा १९५९१ क्रमांकाचा ६ हजार ३९६ रुपयाचा धनादेश विमा कंपनीला दिला होता. २ फरवरी २०१२ ला सदर गाडीला धडक दिल्याने तिचे नुकसान झाले होते. त्यानंतर ती गाडी शोरूमला जमा करून तिचे नुकसानभरपाईचा दावा व गाडीचे नुकसान दुरुस्ती करण्यात आली. यासाठी कंपनीने वेळकाढूपणा करत पांडे यांना गाडी वेळेत दिली नाही. याबाबत त्यांनी कंपनीला विचारणा केली असता त्यांनी इंशुरन्स कंपनीला दिलेला धनादेश अनादर झाल्याने गाडीचा विमा नसल्याची माहिती दिली. यावरून पांडे यांनी बँक व इंशुरंस कंपनीकडे विचारणा करून बँकेत पैसे असल्याचे पुरावे सादर केले. मात्र बँक आॅफ इंडियाचे तत्कालीन व्यवस्थापक यांनी पांडे यांच्या खात्यातून रक्कम वटविण्याऐवजी त्यांनी चुकीच्या व्यक्तीच्या खात्यातील रक्कम वळविली. चुकीचा खाता क्रमांक टाकल्याने इंशुरन्स कंपनीकडे पाठविला धनादेश वटला नाही. याचा फटका पांडे यांना बसला. दरम्यान पांडे यांना गाडीच्या नुकसानभरपाईसाठी कंपनीकडे ३४ हजार रुपये भरावे लागले त्रास सहन करावा लागला. याबाबत त्यांनी भंडारा येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे तक्रार दाखल केली. यात त्यांनी ६० हजार रुपयाची नुकसानभरपाई मिळावी असा दावा इंशूरन्स कंपनी व बँकेविरुद्ध केला. याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी प्रकरणाची सर्व कागदपत्रे व पुरावे तपासली. त्यानंतर यात न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनी व बँक आॅफ इंडिया दोषी असल्याचा ठपका ठेवला. तक्रारकर्ते पांडे यांना अपघातविम्याचे ३४ हजार रुपये हे ७ टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून देण्याचा आदेश दिला. बँकेला पांडे यांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी १० हजार रुपये व खर्चापोटी ५ हजार रुपये ३० दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिला. यावेळी मंचच्या सदस्या गीता बडवाईक, हेमंतकुमार पटेरिया यांनी यात महत्वाची भूमिका वटविली. तक्रारकर्ते पांडे यांच्याकडून अ‍ॅड.यु.बी. तिडके यांनी बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)