शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

नेरला उपसा सिंचनाचे पाणी आठ गावांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:05 IST

पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न कायम : खासदारांकडून अपेक्षा वाढल्या

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही. आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील हिरवेगार पीक केवळ एका पाण्याअभावी अनेकदा गेले. परंतु हा दाहक प्रश्नाला आजपावेतो कुणीही वाचा फोडली नाही. त्यामुळे याकडे नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांनी तरी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.त्या आठ गावातील शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी आणि खरीप हंगामात वेळेवर पाणी शेतीला मिळावे, यासाठी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी खासदार नाना पटोले, माजी सरपंच सुरेंद्र आयतुलवार, तिर्री, मोहन घोगरे सरपंच कलेवाडा व संबंधित विभाग अधिकारी यांची याविषयासंबंधी चर्चा बैठक अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गतवर्षी पार पडली. त्यात सकारात्मक चर्चाही झाली होती. परंतु त्यानंतर पाणी कुठे मुरले हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्या आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला जर पाणी पाहिजे असल्यास मिनी लिफ्टद्वारे बॅक वॉटरचे उपसा करून तो कलेवाडा येथील मामा तलाव गट क्रमांक ६० तथा कमकाझरी मधील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव या दोन्ही तलावात पाणी पोहचले तरच, या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळू शकते. त्या पाण्याचा उपयोग पहेला ते गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यातील पाण्याद्वारे होऊ शकते असा अंदाज माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी वर्तविला आहे. आता संबंधित विभागाद्वारे याचा अभ्यास करून या गावातील शेतकºयांना पाणी मिळेल अशी आशा अद्यापही धुसर आहे. मागील काळात जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी सिंचनासाठी प्रयत्न केले असले तरी त्यांच्या हाताला यश आले नाही. परंतु आता नवनियुक्त खासदार सुनील मेंढे याकछे लक्ष देतील का? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसेल तर त्यांनी शेती करायची कशी. त्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.तिर्री परिसरातील गावांमधील शेतकरी याविषयी संतापलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-सुरेंद्र आयतुलवार, माजी उपसरपंच, तिर्री.पहेला गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यामध्ये गोसे धरणाच्या पाण्यातून मीनी लिफ्ट योजना सुरु केल्यास परिसरातील शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.-मोहन घोगरे, सरपंच, कलेवाडा