शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नेरला उपसा सिंचनाचे पाणी आठ गावांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:05 IST

पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न कायम : खासदारांकडून अपेक्षा वाढल्या

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही. आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील हिरवेगार पीक केवळ एका पाण्याअभावी अनेकदा गेले. परंतु हा दाहक प्रश्नाला आजपावेतो कुणीही वाचा फोडली नाही. त्यामुळे याकडे नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांनी तरी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.त्या आठ गावातील शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी आणि खरीप हंगामात वेळेवर पाणी शेतीला मिळावे, यासाठी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी खासदार नाना पटोले, माजी सरपंच सुरेंद्र आयतुलवार, तिर्री, मोहन घोगरे सरपंच कलेवाडा व संबंधित विभाग अधिकारी यांची याविषयासंबंधी चर्चा बैठक अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गतवर्षी पार पडली. त्यात सकारात्मक चर्चाही झाली होती. परंतु त्यानंतर पाणी कुठे मुरले हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्या आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला जर पाणी पाहिजे असल्यास मिनी लिफ्टद्वारे बॅक वॉटरचे उपसा करून तो कलेवाडा येथील मामा तलाव गट क्रमांक ६० तथा कमकाझरी मधील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव या दोन्ही तलावात पाणी पोहचले तरच, या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळू शकते. त्या पाण्याचा उपयोग पहेला ते गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यातील पाण्याद्वारे होऊ शकते असा अंदाज माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी वर्तविला आहे. आता संबंधित विभागाद्वारे याचा अभ्यास करून या गावातील शेतकºयांना पाणी मिळेल अशी आशा अद्यापही धुसर आहे. मागील काळात जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी सिंचनासाठी प्रयत्न केले असले तरी त्यांच्या हाताला यश आले नाही. परंतु आता नवनियुक्त खासदार सुनील मेंढे याकछे लक्ष देतील का? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसेल तर त्यांनी शेती करायची कशी. त्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.तिर्री परिसरातील गावांमधील शेतकरी याविषयी संतापलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-सुरेंद्र आयतुलवार, माजी उपसरपंच, तिर्री.पहेला गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यामध्ये गोसे धरणाच्या पाण्यातून मीनी लिफ्ट योजना सुरु केल्यास परिसरातील शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.-मोहन घोगरे, सरपंच, कलेवाडा