शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

नेरला उपसा सिंचनाचे पाणी आठ गावांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:05 IST

पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न कायम : खासदारांकडून अपेक्षा वाढल्या

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही. आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील हिरवेगार पीक केवळ एका पाण्याअभावी अनेकदा गेले. परंतु हा दाहक प्रश्नाला आजपावेतो कुणीही वाचा फोडली नाही. त्यामुळे याकडे नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांनी तरी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.त्या आठ गावातील शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी आणि खरीप हंगामात वेळेवर पाणी शेतीला मिळावे, यासाठी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी खासदार नाना पटोले, माजी सरपंच सुरेंद्र आयतुलवार, तिर्री, मोहन घोगरे सरपंच कलेवाडा व संबंधित विभाग अधिकारी यांची याविषयासंबंधी चर्चा बैठक अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गतवर्षी पार पडली. त्यात सकारात्मक चर्चाही झाली होती. परंतु त्यानंतर पाणी कुठे मुरले हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्या आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला जर पाणी पाहिजे असल्यास मिनी लिफ्टद्वारे बॅक वॉटरचे उपसा करून तो कलेवाडा येथील मामा तलाव गट क्रमांक ६० तथा कमकाझरी मधील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव या दोन्ही तलावात पाणी पोहचले तरच, या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळू शकते. त्या पाण्याचा उपयोग पहेला ते गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यातील पाण्याद्वारे होऊ शकते असा अंदाज माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी वर्तविला आहे. आता संबंधित विभागाद्वारे याचा अभ्यास करून या गावातील शेतकºयांना पाणी मिळेल अशी आशा अद्यापही धुसर आहे. मागील काळात जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी सिंचनासाठी प्रयत्न केले असले तरी त्यांच्या हाताला यश आले नाही. परंतु आता नवनियुक्त खासदार सुनील मेंढे याकछे लक्ष देतील का? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसेल तर त्यांनी शेती करायची कशी. त्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.तिर्री परिसरातील गावांमधील शेतकरी याविषयी संतापलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-सुरेंद्र आयतुलवार, माजी उपसरपंच, तिर्री.पहेला गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यामध्ये गोसे धरणाच्या पाण्यातून मीनी लिफ्ट योजना सुरु केल्यास परिसरातील शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.-मोहन घोगरे, सरपंच, कलेवाडा