शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

नेरला उपसा सिंचनाचे पाणी आठ गावांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:05 IST

पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न कायम : खासदारांकडून अपेक्षा वाढल्या

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही शाश्वती नाही. आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील हिरवेगार पीक केवळ एका पाण्याअभावी अनेकदा गेले. परंतु हा दाहक प्रश्नाला आजपावेतो कुणीही वाचा फोडली नाही. त्यामुळे याकडे नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांनी तरी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.त्या आठ गावातील शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी आणि खरीप हंगामात वेळेवर पाणी शेतीला मिळावे, यासाठी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी खासदार नाना पटोले, माजी सरपंच सुरेंद्र आयतुलवार, तिर्री, मोहन घोगरे सरपंच कलेवाडा व संबंधित विभाग अधिकारी यांची याविषयासंबंधी चर्चा बैठक अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गतवर्षी पार पडली. त्यात सकारात्मक चर्चाही झाली होती. परंतु त्यानंतर पाणी कुठे मुरले हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्या आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला जर पाणी पाहिजे असल्यास मिनी लिफ्टद्वारे बॅक वॉटरचे उपसा करून तो कलेवाडा येथील मामा तलाव गट क्रमांक ६० तथा कमकाझरी मधील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव या दोन्ही तलावात पाणी पोहचले तरच, या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळू शकते. त्या पाण्याचा उपयोग पहेला ते गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यातील पाण्याद्वारे होऊ शकते असा अंदाज माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी वर्तविला आहे. आता संबंधित विभागाद्वारे याचा अभ्यास करून या गावातील शेतकºयांना पाणी मिळेल अशी आशा अद्यापही धुसर आहे. मागील काळात जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी सिंचनासाठी प्रयत्न केले असले तरी त्यांच्या हाताला यश आले नाही. परंतु आता नवनियुक्त खासदार सुनील मेंढे याकछे लक्ष देतील का? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसेल तर त्यांनी शेती करायची कशी. त्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.तिर्री परिसरातील गावांमधील शेतकरी याविषयी संतापलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-सुरेंद्र आयतुलवार, माजी उपसरपंच, तिर्री.पहेला गोलेवाडी मार्गावर असणाºया नाल्यामध्ये गोसे धरणाच्या पाण्यातून मीनी लिफ्ट योजना सुरु केल्यास परिसरातील शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.-मोहन घोगरे, सरपंच, कलेवाडा