शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

वैनगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ‘नीरी’चा पुढाकार

By admin | Updated: June 14, 2016 00:18 IST

वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

स्वयंसेवी संस्थेला मिळाले पत्र : नगरपालिकेला प्रस्तावाची सूचनाभंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा स्थितीत वैनगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेने (नीरी) पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या आशयाचे पत्र ग्रीन हेरीटेज बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्थेला प्राप्त झाले आहे. यात भंडारा नगर पालिका प्रशासनाला सुचित करून नदीच्या प्रदुषणाबाबत ‘नीरी’च्या माध्यमातून सर्व्हे करण्याची तयारी दर्शविली आहे. नागनदीचे घाण पाणी आणि जलपर्णी वनस्पती (ईकॉर्निया) यामुळे वैनगंगेचे पाणी दूषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातून ही वनस्पती काढण्याचे काम प्रशासनाकडून अधुनमधून केले जाते. परंतु पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत ठोस उपयायोजना अद्यापही झालेली नासल्याने भंडारेकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु असून नागपुरातून येणाऱ्या नागनदीचे केमिकलयुक्त घाण पाणी वैनगंगा नदीत मिसळत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. विद्यमान स्थितीत भंडारेकरांना दूषित पाण्यामुळे विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत या समस्येवर रामबाण उपायांवर काम होणे अगत्याचे झाले आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषदद्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी बऱ्याच दिवसांपासून वैनगंगेचे पाणी पिणे बंद केले आहे. श्रीमंतांच्या घरी ‘आरो’ची सुविधा असली तरी गरिबांनी दूषित पाणी पिऊन आजार ओढून घ्यायचा काय, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात ग्रीन हेरिटेजचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी याबाबत ‘नीरी’शी पत्रव्यवहार सुरू केला आहे. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जाऊ न देता ते पाणी शुद्ध करण्याची गरज आहे. याबाबत नीरी संस्थेनेही पुढाकार घेण्याबाबत संमती दिल्याचे समजते. आता गरज आहे ती भंडारा नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराची. (प्रतिनिधी)