शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पाण्याच्या बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची गरज

By admin | Updated: November 1, 2014 22:47 IST

कमी पर्जन्यमानामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. कुटूंब चालविताना ज्याप्रमाणे काटकसर केली जाते. तीच काटकसर पाण्याच्या बाबतीत केली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.

भंडारा : कमी पर्जन्यमानामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. कुटूंब चालविताना ज्याप्रमाणे काटकसर केली जाते. तीच काटकसर पाण्याच्या बाबतीत केली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. सार्वजनिक नळाला तोट्या बसविल्यास दररोज ७ हजार लिटर्स पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे मूल्य जाणून बचत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भंडारा शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. शहराला पाणी पुरवठा जुन्या टाकीतुन होत असुन तिची क्षमता ६० हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्याची आहे. शहरातील ५० टक्के नागरिकांकडे नळजोडणी आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास दररोज १५ दशलक्ष लिटरची पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या क्षमतेअभावी सर्व नळ जोडणीधारकांना दोन वेळेला नऊ दशलक्ष लिटर्स पिण्याचे पाणी एका दिवसाला पुरवठा करण्यात येत आहे. शहर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहरात घरगुती १२ हजार नळ जोडणी असून ३०० जोडणी सार्वजनिक आहेत.सुमारे ५० वर्षापासून जोडण्यात आलेल्या जलवाहिनीतुन पालिका प्रशासन शहरातील नळ जोडणीधारकांना पाण्याचा पुरवठा करीत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या जलवाहिन्या अनेक ठिकाणाहून जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात लिकेज होतात. लिकेजमुळे अनेकदा शहरातील पाणी पुरवठा कित्येकदा बंद राहतो. जुन्या फिल्टर प्लँटची क्षमता कमी असल्याने शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा करताना पालिका प्रशासनाची कसरत होत आहे. मुख्य जलवाहिनीवर असलेल्या नळ जोडणीस तोट्या लावणे आवश्यक असते. परंतु, तोट्या नसल्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होतो. शिवाय, रस्त्यावर आणि प्रांगणात सडा टाकून पाणी वाया घालविले जाते. यात हजारो लिटर्स पाण्याची नासाडी होते. आवश्यक पाणी घेऊन नळाच्या तोट्या बंद कराव्यात. त्यामुळे मोठ्या दाबाने खालच्या नागरिकांपर्यंत नियमानुसार पाणी मिळेल. परंतु, असे होत नाही. पिण्याचे पाणी भरल्यानंतरही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पाणी बचतीविषयी विचार केला तर शहरातील सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्यात आल्यास तब्बल सात हजार लिटर्स पाण्याची दररोज बचत होऊ शकते. पालिकेकडून पाणी सोडल्यानंतर तोट्या नसल्याने आणि गळतीमधून पाणी वाया जात आहे. (शहर प्रतिनिधी)