शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

रस्ता बांधकामासाठी राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:04 IST

येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक रस्त्याचे बांधकाम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद चौक-राजीव गांधी चौक-खात रोडपर्यंत रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद चौकातून महिनाभरापूर्वी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. परंतु १५ दिवसांपूर्वी नगरपरिषदेने महामार्ग प्रशासनाला पत्र दिले. त्यामुळे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ काम सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. साईमंदिरापासून निघालेल्या या मोर्चातील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. जिल्हा कचेरीवर हा मोर्चा पोहचल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु झाले नाही तर भंडारा बंदचा इशाराही देण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अ‍ॅड.जयंत वैरागडे, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, बाबूराव बागडे, परवेज पटेल, जुगल भोंगाडे, नगरसेवक उमेश ठाकरे, नगरसेविका अश्विनी बुरडे, नगरसेवक अमर उजवणे, मधुकर चौधरी, सुनील साखरकर, शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे, रामदास शहारे, नरेंद्र झंझाड, राजू हाजी सलाम, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, सेवादल जिल्हाध्यक्ष सुनील शहारे, प्राध्यापक राजपूत, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र वानखेडे, सुमीत घोगरे, विजय खेडीकर, सरिता मदनकर, हर्षा वैद्य, रत्नमाला वैद्य, निलीमा गाढवे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.महामार्गावर रस्ता रोकोराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी काही काळ आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.