शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामासाठी राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:04 IST

येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक रस्त्याचे बांधकाम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद चौक-राजीव गांधी चौक-खात रोडपर्यंत रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद चौकातून महिनाभरापूर्वी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. परंतु १५ दिवसांपूर्वी नगरपरिषदेने महामार्ग प्रशासनाला पत्र दिले. त्यामुळे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ काम सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. साईमंदिरापासून निघालेल्या या मोर्चातील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. जिल्हा कचेरीवर हा मोर्चा पोहचल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु झाले नाही तर भंडारा बंदचा इशाराही देण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अ‍ॅड.जयंत वैरागडे, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, बाबूराव बागडे, परवेज पटेल, जुगल भोंगाडे, नगरसेवक उमेश ठाकरे, नगरसेविका अश्विनी बुरडे, नगरसेवक अमर उजवणे, मधुकर चौधरी, सुनील साखरकर, शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे, रामदास शहारे, नरेंद्र झंझाड, राजू हाजी सलाम, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, सेवादल जिल्हाध्यक्ष सुनील शहारे, प्राध्यापक राजपूत, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र वानखेडे, सुमीत घोगरे, विजय खेडीकर, सरिता मदनकर, हर्षा वैद्य, रत्नमाला वैद्य, निलीमा गाढवे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.महामार्गावर रस्ता रोकोराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी काही काळ आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.