शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

नवतपा : आग ओकतोय सूर्य

By admin | Updated: May 24, 2014 23:20 IST

सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपाला उद्या, २५ मे पासून प्रारंभ होत आहे. त्यापूर्वीच दरवर्षीप्रमाणे आता उन्ह तापू लागले आहे. सलग दुसर्‍या दिवशी भंडार्‍यात उष्णतेने फिरणे असह्य केले.

पारा भडकला : तापमान ४५.५ अंशावर, रस्ते झाले निर्मनुष्य

भंडारा : सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपाला उद्या, २५ मे पासून प्रारंभ होत आहे. त्यापूर्वीच दरवर्षीप्रमाणे आता उन्ह तापू लागले आहे. सलग दुसर्‍या दिवशी भंडार्‍यात उष्णतेने फिरणे असह्य केले. ही तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. यावर्षीच्या हंगामातील उन्हाच्या सर्वाधिक झळा आज शनिवारला जाणवल्या.

दरवर्षीच मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पारा उच्चाक गाठतो. मागील आठवड्यात ४0 ते ४२ अंशादरम्यान असलेले तापमान या आठवड्याच्या शेवटी ४५ अंशावर पोहोचले. शनिवारी ४५.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. यावर्षीची ही सर्वाधिक नोंद आहे.

उष्णतेत कमालिने वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सुर्य आग ओकु लागला आहे. उष्ण वारे वाहत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. शहरातील वर्दळ सायंकाळपर्यंत मंदावली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे.

मागील १२ वर्षांमध्ये सर्वाधिक तापमान सन २00२ मध्ये ४३ अंश, २00३ मध्ये ४२ अंश, २00४ मध्ये ४२ अंश, २00५ मध्ये ४६ अंश, २00६ मध्ये ४२ अंश, २00७ मध्ये ४४.५ अंश, २00८ मध्ये ४२.५ अंश, २00९ मध्ये ४४.५, सन २0१0 मध्ये ४६ अंश, २0११ मध्ये ४६.५ अंश, सन २0१२ मध्ये ४६.५ अंश, सन २0१३ मध्ये ४६ अंश तर यावर्षी दि.२४ मे रोजी ४५.५ अंश तापमान नोंदविण्यात आले.

यावर्षीचा उन्हाळा जीवघेणा ठरत दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट आहे. वाहतूक ठप्प होत असून रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे. दुपारी फेरीवाले फिरताना दिसत नाहीत. नागरिकांचीही वर्दळ नाही. दिवसभर कुलरच्या हवेत कामकाज सुरु आहे. बसेसमधील गर्दीही ओसरली आहे. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेच्या बचावासाठी शहरात ठिकठिकाणी रसवंती, शितपेयांची दुकाने थाटलेली आहेत. टरबूज, खरबूज, डांगर, अननस आदींची विक्री वाढली आहे. एप्रिल महिन्यात १0 रूपयांपासून ६0 रूपयांपर्यत टरबुजची किंमत होती. मे महिन्यात त्या किमतीत कमालिने वाढ झालेली आहे. आता ५0 रूपयांपासून १00 रूपयांपर्यत टरबुजची विक्री सुरू आहे. पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कडक उन्हामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. घराबाहेर महत्वाच्या कामानिमित्त पडायचे असेल तर दिवसा छत्री घेऊन जावे लागत आहे. उष्माघाताच्या बचावासाठी खिशात कांदा बाळगण्यात येत आहे.

(नगर प्रतिनिधी)