शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

सौर कृषिपंप देणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी

By admin | Updated: November 19, 2015 00:18 IST

औष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे.

भंडारा जिल्ह्याला १९६ नगांचा पुरवठा : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना भरीव पुरवठामोहन भोयर तुमसरऔष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे. कृषिपंप सौर उर्जेवर शेतकऱ्यांना देण्याकरिता ऊर्जा विभागाने कंबर कसली असून राज्याला ७,५४० सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापैकी भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला १९६ नग आले आहेत.केंद्र शासनाने राष्ट्रीयस्तरावर १ लाख नग सौरकृषिपंपाच्या योजनेसाठी ४०० कोटींची तरतुद केली आहे. राज्यासाठी वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये ३० टक्के प्रमाणे १३३.५० कोटी एवढे केंद्रीय वित्त सहाय्य उपलब्ध होणार आहे. नियमित विद्युत पुरवठा किंव विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. केंद्रीय अनुदान राज्याचे अनुदान व लाभार्थ्यांचा हिस्सा विचारात घेऊन सौर कृषिपंप देण्याची योजना तयार करण्यात आली. ५ एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ एच.पी. क्षमतेचे सौर कृषीपंप देण्याच्या योजनेस मान्यता मिळाली आहे. यात प्राधान्य अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत विहीरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील श्ोतकरी, महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित ग्राहकांपैकी तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा शक्य नाही, असे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून ठरविण्यात येईल. या योजनेचा लाभ व उद्दिष्ट हे केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार व उपलब्ध वित्तीय सहाय्यावर अवलंबून राहणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा केवळ पाच टक्के राहणार असल्याने शेतकऱ्यांकरिता ही योजना नवसंजिवनी ठरली आहे.