शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

सौर कृषिपंप देणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी

By admin | Updated: November 19, 2015 00:18 IST

औष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे.

भंडारा जिल्ह्याला १९६ नगांचा पुरवठा : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना भरीव पुरवठामोहन भोयर तुमसरऔष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे. कृषिपंप सौर उर्जेवर शेतकऱ्यांना देण्याकरिता ऊर्जा विभागाने कंबर कसली असून राज्याला ७,५४० सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापैकी भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला १९६ नग आले आहेत.केंद्र शासनाने राष्ट्रीयस्तरावर १ लाख नग सौरकृषिपंपाच्या योजनेसाठी ४०० कोटींची तरतुद केली आहे. राज्यासाठी वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये ३० टक्के प्रमाणे १३३.५० कोटी एवढे केंद्रीय वित्त सहाय्य उपलब्ध होणार आहे. नियमित विद्युत पुरवठा किंव विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. केंद्रीय अनुदान राज्याचे अनुदान व लाभार्थ्यांचा हिस्सा विचारात घेऊन सौर कृषिपंप देण्याची योजना तयार करण्यात आली. ५ एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ एच.पी. क्षमतेचे सौर कृषीपंप देण्याच्या योजनेस मान्यता मिळाली आहे. यात प्राधान्य अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत विहीरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील श्ोतकरी, महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित ग्राहकांपैकी तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा शक्य नाही, असे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून ठरविण्यात येईल. या योजनेचा लाभ व उद्दिष्ट हे केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार व उपलब्ध वित्तीय सहाय्यावर अवलंबून राहणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा केवळ पाच टक्के राहणार असल्याने शेतकऱ्यांकरिता ही योजना नवसंजिवनी ठरली आहे.