शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

निसर्गाची वक्रदृष्टी कायम

By admin | Updated: July 12, 2014 23:30 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळानंतर शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतकरी संकटाच्या भीतीने हतबल झाल्याचे दिसत आहे.

साकोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळानंतर शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतकरी संकटाच्या भीतीने हतबल झाल्याचे दिसत आहे. सततच्या नापीकीमुळे शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.मागीलवर्षीच्या खरीप हंगामात जून महिना सुरू होताच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले. या अतिवृष्टीमुळे मागीलवर्षी धान, तुर, सोयाबिन तसेच खरीप हंगामातील इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर रब्बी हांगामातही संततधार पावसाने व गारपिटीने पिकाचे होत्याचे नव्हते केले. मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळातून शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षीच्या खरीप हंगामात त्याची भरपाई मिळेल या हेतुने शेतकऱ्यांनी उन्हातान्हात राबराब राबून शेतीची मशागत केल्यानंतर बँकेतून कर्ज काढून तर काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामाची कशीबशी धानभरणी केली.पावसाने अजूनपर्यंत हजेरी न लावल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. उष्णतेच्या तडाख्यात हिरवेगार दिसरणारे शेतशिवार आता ओसाड दिसू लागले आहेत. अशा संकटाच्या मालिकेने शेतकरी पुस्ता हादरून गेला आहे. शेतकऱ्यांनी आता पाऊस येईल या आशेने पेरणी उरकून घेतली. परंतु पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या दिसत आहेत. उन्हाचा तडाखा पावसाची पाठ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडलेला दिसत आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)