शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्याची कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी सध्या चौकशी सुरु असल्याचे समजते.

ठळक मुद्देसर्वत्र धूळच धूळ : महामार्ग प्राधीकरणाचे दुर्लक्ष, पाणी शिंपडण्याकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रामटेक-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. देव्हाडी शिवारातून जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरु असून मुरुम घातलेल्या रस्त्यावर पाणी शिंपडले जात नाही. त्यामुळे सर्वत्र धुळच धुळ हवेत तरंगत आहे. समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताची मालीका येथे सुरु आहे. रस्त्यावरील मुरुमही येथे समतल न केल्याने दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्याची कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी सध्या चौकशी सुरु असल्याचे समजते.देव्हाडी-माडगी शिवारातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूमार्ग ठरला आहे. पुलाचे वळणमार्ग धोकादायक असून रस्त्यावरील मुरुमाची धुळ प्रचंड उडत आहे. पाणी शिंपडण्याची गरज असताना यंत्रणा येथे गाफील आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक मंत्र्याना तक्रार केली आहे.-निशिकांत पेठे, प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस.देव्हाडी माडगी शिवारातील एक किमीचा रस्ता बांधकाम सुरु असून पाण्याची समस्या असल्याने पाणी शिंपडले जात नाही. उर्वरीत समस्या लवकर निकाली काढण्यात येईल. पाणी उपलब्ध व्हावे याकरिता संबंधित विभागाशी संपर्क करणार आहे.-संजीव जगताप, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण.अपघाताची मालिका सुरूचसध्या रस्त्यावर मुरुम घालण्यात आले आहे. नियमानुसार त्यावर पाणी शिंपडणे अनिवार्य आहे. परंतु येथे पाणी घातले जात नाही. परिणामी परिसरात सर्वच धुलीकण मोठ्या वातावरणात पसरत आहेत. सदर रस्ता अतिशय वर्दळीचा असून धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताची मालिका येथे सुरु आहे.मुरुमाचे ढीगरस्त्यावर घालण्याकरिता मुरुम आणून ठेवण् यात आले आहे. मुरुम हा पसरविल्याने ढिगावर आवळून अपघाताची शक्यता वाढली आहे. नवनिर्मित रस्त्यावर खड्डे पडले आहे. रात्री हे खड्डे वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे वाहन अनियंत्रीत होऊन अपघात वाढले आहे.आजाराला आमंत्रण२४ तास वाहनांची वर्दळ असल्याने परिसरात धुळीकण हवेत तरंगत आहेत. त्यामुळे खोकला, अ‍ॅलर्जी या रुग्णसंख्येत वाढ झाली आहैे. लहान मुले, वृद्धांना फुफ्फूसाचा आजार बळावला आहे. प्रदूषणात वाढ झालेली आहे.यंत्रणेचे नियंत्रण नाहीरस्ता बांधकामावर केंद्रीय रस्ते विभागाचे नियंत्रण असून विभागीय कार्यालय नागपूर येथे आहे. संबंधित समस्येवर कुणाला तक्रार करावी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा