शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

दीक्षांत समारंभाच्या नावावर सावाळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:41 IST

दीक्षांत समारोहाच्या आयोजनाचे कारण पुढे करून एक अधिसूचना काढून २४ मार्चला होणाऱ्या ११८ परीक्षा पुढे ढकलण्याचे काम नागपूर विद्यापिठाने केले आहे. विद्यापिठाच्या या कारभाराचा फटका ६७० महाविद्यालयातील चार लाख ५० हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे.

ठळक मुद्देसिनेट सदस्य उदापुरेंचा आरोप : राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमतभंडारा : दीक्षांत समारोहाच्या आयोजनाचे कारण पुढे करून एक अधिसूचना काढून २४ मार्चला होणाऱ्या ११८ परीक्षा पुढे ढकलण्याचे काम नागपूर विद्यापिठाने केले आहे. विद्यापिठाच्या या कारभाराचा फटका ६७० महाविद्यालयातील चार लाख ५० हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. हे प्रकरण गंभीर असून विद्यार्थ्यांच्या हिताविरूद्ध आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाची तक्रार विद्यापिठाचे कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडे करणार असल्याचे सिनेट सदस्य प्रविण उदापुरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.यावेळी उदापुरे म्हणाले, विद्यापीठ परीक्षेचे वेळापत्रक हे दोन महिन्यापूर्वीच ठरविले जाते. दिक्षांत समारंभ २४ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्यामुळे ११८ परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्याची अधिसूचना २० मार्च रोजी काढण्यात आली.ही अधिसूचना नागपूर शहरातील वृत्तपत्रात आहे. सध्या विद्यार्थी परीक्षेत व्यस्त असल्यामुळे त्यांना ही अधिसुचना माहित नाही. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी संपूर्ण परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. विद्यापिठाने पुढे ढकललेल्या परीक्षा ८ एप्रिल रोजी होणार असून ज्यांनी त्यादिवशी इतर ठिकाणी जाण्याचा किंवा परीक्षेचा कार्यक्रम ठरविला असल्यास किंवा एखाद्या विद्यार्थ्याने न्यायालयात दाद मागितल्यास संपूर्ण विद्यापीठ प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.एकीकडे सेमेस्टर पॅटर्न हे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे शैक्षणिक धोरण राबविले जात असून त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशासनावर ताण पडत आहे. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गृह विभागाच्या सल्ल्यानुसार किंवा विशेष आणिबाणीची परिस्थिती उद्भवली तेव्हाच परीक्षा पुढे ढकलल्या जातात. परंतुविद्यापिठाने या परीक्षा पुढे ढकलून काय साध्य केले आहे हा संशोधनाचा विषय आहे.दिक्षांत समारंभ महत्वाचा की, परीक्षा हा प्रश्न निर्माण झाला. विद्यापिठावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी या नात्याने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता २४ मार्च रोजी दिक्षांत समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचा ईशाराही उदापुरे यांनी दिला आहे.