शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

पवनी नगराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ते तालुक्याचे व वर्दळीचे ठिकाण आहे. व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी वर्ग या शहरांत स्थायिक ...

पवनी नगराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ते तालुक्याचे व वर्दळीचे ठिकाण आहे. व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी वर्ग या शहरांत स्थायिक आहेत व ते गुण्यागोविंदाने राहत आहेत. जिल्ह्यातील सर्वांत जुनी नगरपरिषद म्हणून पवनी नगर परिषदकडे पाहिले जाते. नगरात विकासाची अनेक कार्ये सुरू आहेत; पण त्याकडे लक्ष देणारे अधिकारी नाहीत. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली. त्यासाठी खोदलेले रस्त्याचे काँक्रीट व माती रस्त्यांवर पसरली आहे. पावसाळ्यात माती ओली होऊन संपूर्ण शहरात चिखल होतो आहे; त्यामुळे चालणे, गाडीवरून जाणे धोकादायक ठरत आहे. जवाहर गेट ते वैनगंगा नदी या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे; परंतु अजूनही पावसाळ्यापर्यंत पूर्ण झाले नाही; त्यामुळे त्या रस्त्यावर खड्डे पडून आहेत; त्यामुळे अपघात वाढले आहेत. वरील समस्या व इतर अनेक समस्यांवर चर्चा करण्यासाठी सिटीझन फोरमचे सदस्य २०-२२ दिवसांपासून मुख्याधिकारी यांना वेळ देण्यासाठी आग्रह करीत आहेत; परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे तुमसर व भंडारा येथील कार्यालयांचा कार्यभार असल्यामुळे ते पवनीला रोज येऊ शकत नाहीत. जनतेला समस्यांसाठी भेटायचे असल्यास भंडाऱ्याला जा असे उद्धट उत्तर नगर परिषोच्या कार्यालयातून मिळत आहे; त्यामुळे अधिकारी व जनता यांतील संवाद तुटला आहे आणि समस्या अधिकच वाढत आहेत.

सिटीझन फोरमचे सदस्य व जनता रोज मुख्याधिकारी कधी येणार म्हणून पाच-सहा तास वाट पाहत असते; परंतु साहेब कधी येणार याचा कुणालाच थांगपत्ता नसतो. पवनी नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी असावा. प्रभारी पद देऊन प्रशासन जनतेची थट्टा व पिळवणूक करीत आहे. येणाऱ्या काळात शहरात चिखलामुळे अपघात किंवा खड्डे असलेल्या रस्त्यांवर अपघात झाले व कुणाचा जीव गेला, रुग्ण दगावला किंवा अपंगत्व आले तर सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. त्यासाठी कायदेशीर, न्यायालयीन मार्ग अवलंबिले जातील, असा गंभीर इशारा राज्याचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे. निवेदनावर सिटीझन फोरमचे वैभव बावनकर, संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, निशांत नंदनवार, हिमांशू थोटे, कुणाल हटवार, हिमांशू बावनकर, कुणाल चामोर्शीकर, रितेश झगडू, पारितोष वंजारी, निखिल शहारे यांनी स्वाक्षरी केलेली आहे.