शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नगर परिषदेचे वाद येऊ लागले चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

तीन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. बंडखोर गटाचे सर्वांत जास्त नगरसेवक ...

तीन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. बंडखोर गटाचे सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आले. त्यामुळे भाजप व काँग्रेसला अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. जेव्हा नगर पंचायतमध्ये सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा बंडखोर गटाने पुन्हा भाजपचा घरोबा केला. परंतु, नगर पंचायतची सत्ता सूत्रे किंगमेकर ठरलेल्या बांधकाम सभापती यांच्या हाती राहिली. तेव्हा त्यांच्याबद्दल काही जणांमध्ये द्वेषसुद्धा निर्माण झाला होता. आमच्या मर्जीने कामे व्हावीत, अशी इच्छा सहकारी सभापती यांच्यासह पक्षाचे व विरोधी पक्षाचे नेते आणि नगरसेवक बाळगत होते. परंतु, शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ही बाब येथे वेळोवेळी सिद्ध होत राहिली. कुणी कितीही तक्रार केली तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सभापतींनी आपल्या पद्धतीने नगर पंचायतचे कामकाज चालविण्याचे काम केले. त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशीसुद्धा समन्वय साधला नाही, असा आरोप भाजपचे पदाधिकारी करीत राहिले. मात्र, दोन महिला सभापतींनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती आपल्या मर्जीप्रमाणे कारभार चालवित असून, निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नगर पंचायतचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

आपल्या वाॅर्डातील नगरसेवकाकडे किंवा संबंधित सभापतीकडे नागरिक धाव घेत आपल्या समस्या मांडतात. मात्र, या समस्या मार्गी लावण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. यामुळेच स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा सभापती दमयंता भूमेश्वर कोटांगले आणि महिला व बालकल्याण सभापती मंगला महेश चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर अद्यापही कुठलाही विचार करण्यात आला नाही. मात्र, या प्रकारामुळे नगर पंचायतच्या विकासकामाला खीळ बसण्याची शक्यता आहे. आधीच अनेक बाबतीत विकासापासून कोसोदूर असलेल्या नगर पंचायतला खीळ बसण्याची शक्यता आहे.