शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिखलाबोडीत तणाव दोन वनरक्षक निलंबित

By admin | Updated: December 23, 2016 00:28 IST

बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू : सरकारने दिली आठ लाख रूपयांची आर्थिक मदत, वनविभागाकडून मृत मुलीच्या वडिलाला रोजगार

बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू : सरकारने दिली आठ लाख रूपयांची आर्थिक मदत, वनविभागाकडून मृत मुलीच्या वडिलाला रोजगार लाखनी : आजीसोबत शेतात गेलेल्या खुशी राजु सराटे या चार वर्षीय बालिकेला बिबट्याने ठार केले. या घटनेला वनविभाग दोषी असून २० लाख रूपयांची आर्थिक मदत द्यावी, वडिलाला नोकरीवर सामावून घ्यावे अन्यथा शवविच्छेदनासाठी मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे चिखलाबोडी गुरूवारला सकाळपासून तणावपूर्ण स्थिती होती. परिणामी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या घटनेची माहिती होताच खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार, माजी आमदार सेवक वाघाये यांनी सराटे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. राज्य शासनाच्या वनविभागातर्फे सराटे कुटुबीयांना आठ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. सरपनासाठी लाकडे आणताना हे वनरक्षक महिलांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी संतप्त जमावाने केला. त्यानंतर उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी या घटनेला जबाबदार असलेले वनरक्षक जाधव व वनरक्षक धकाते या दोघांच्या तातडीने निलंबनाचे आदेश दिले. याशिवाय मृत मुलीच्या वडिलांना २९८ रूपये मजुरी याप्रमाणे दररोज काम देण्याचे आश्वासन दिले. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळाहून २०० मीटर अंतरावर पिंजरे लावण्यात आले आहेत. बीटरक्षक आर.आर. चवरे, पी.एस. मस्के, वनमजूर जी.एस. मेंढे यांना याठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ वाजता मृत बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखलाबोडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्यात येतो. चिखलबोडी, दैतमांगली, गोंडसावरी या कोका-करडी वन्यजीव अभरण्याला लागून असलेल्या गावात वन्यप्राण्याची दहशत आहे. गावकऱ्यांची जनावरे वन्यप्राणी मारतात. एखाद्या वन्यप्राण्यांची शिकार झाल्यास गावातील लोकांना वेठिस धरले जाते. त्यामुळे वनकर्मचारी व अधिकाऱ्यांविरूद्ध संताप नागरिकांनी व्यक्त केला. मृत बालिकेच्या कुटूंबियांना आर्थिक मदत द्यावी यासाठी गावकऱ्यांनी शवविच्छेदन व अंत्यसंस्कारास नकार दिला होता. गावकरी व वनविभागाचे कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने लोकांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयग्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)