शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

भंडारा-पवनी राज्यमार्गाच्या दुरूस्तीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:14 IST

भंडारा ते पवनी या राज्यमार्गाची चाळण होवून मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ३० नोव्हेंबर रोजी पहेला येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आठवडाभरात या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देआठवडाभराचा अल्टीमेटम : दुरुस्तीचे काम लवकर होणार, अधिकाऱ्यांनी दिले सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा ते पवनी या राज्यमार्गाची चाळण होवून मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ३० नोव्हेंबर रोजी पहेला येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आठवडाभरात या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.भंडारा नजिकच्या कारधा येथून पवनीकडे जाणाºया राज्यमार्गाची दुरावस्था झाली असून, तब्बल ४२ किमीचा हा मार्ग ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे या मार्गावर अपघात वाढले असून, काही जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना अपंगत्व आले आहे. पवनी ते भंडारा पर्यंत या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून जवळपास २८० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. परंतु, मागील चार वर्षात संबंधित कंत्राटदार कंपनीच्या वतिने कामात हयगय केली जात आहे. नादुरूस्त रस्त्यावर केवळ मुरूम टाकून लिपापोती केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शुक्रवारी पहेला येथे माजी आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करून पवनी ते भंडारा या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. रस्त्याच्या दुरूस्तीचे ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. परिणामी, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. आंदोलकांशी चर्चा करीत लवकरच या मार्गाची दुरूस्ती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आठवडाभरात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, प्रेमानंद नखाते, राजू थोटे, दयानंद नखाते, अमोल भुरले, शरद फेंडर, सरपंच सुनिल शेंडे, उपसरपंच अनिल गिरडकर, गणेश वैद्य, मदन भुरले, विष्णू दहिवले, रवी आजबले, विनोद भोयर, राजू हलमारे, अन्ना टिचकुले, मयूर लांजेवार, आकाश बांते, प्रज्वल कांबळे, सागर वैद्य, रंजित बोरकर, घनश्याम बागडे, शंकर मडावी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.