शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

भंडारा-पवनी राज्यमार्गाच्या दुरूस्तीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:14 IST

भंडारा ते पवनी या राज्यमार्गाची चाळण होवून मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ३० नोव्हेंबर रोजी पहेला येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आठवडाभरात या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देआठवडाभराचा अल्टीमेटम : दुरुस्तीचे काम लवकर होणार, अधिकाऱ्यांनी दिले सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा ते पवनी या राज्यमार्गाची चाळण होवून मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ३० नोव्हेंबर रोजी पहेला येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आठवडाभरात या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.भंडारा नजिकच्या कारधा येथून पवनीकडे जाणाºया राज्यमार्गाची दुरावस्था झाली असून, तब्बल ४२ किमीचा हा मार्ग ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे या मार्गावर अपघात वाढले असून, काही जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना अपंगत्व आले आहे. पवनी ते भंडारा पर्यंत या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून जवळपास २८० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. परंतु, मागील चार वर्षात संबंधित कंत्राटदार कंपनीच्या वतिने कामात हयगय केली जात आहे. नादुरूस्त रस्त्यावर केवळ मुरूम टाकून लिपापोती केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शुक्रवारी पहेला येथे माजी आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करून पवनी ते भंडारा या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. रस्त्याच्या दुरूस्तीचे ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. परिणामी, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. आंदोलकांशी चर्चा करीत लवकरच या मार्गाची दुरूस्ती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आठवडाभरात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, प्रेमानंद नखाते, राजू थोटे, दयानंद नखाते, अमोल भुरले, शरद फेंडर, सरपंच सुनिल शेंडे, उपसरपंच अनिल गिरडकर, गणेश वैद्य, मदन भुरले, विष्णू दहिवले, रवी आजबले, विनोद भोयर, राजू हलमारे, अन्ना टिचकुले, मयूर लांजेवार, आकाश बांते, प्रज्वल कांबळे, सागर वैद्य, रंजित बोरकर, घनश्याम बागडे, शंकर मडावी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.