शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST

सुबोध वंजारी : वाहतूक सुरक्षिततेची माहिती मोहाडी : सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. त्यासाठी वाहतुकीच्या नियमांची वर्षभर प्रामाणिक अंमलबजावणी ...

सुबोध वंजारी : वाहतूक सुरक्षिततेची माहिती

मोहाडी : सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. त्यासाठी

वाहतुकीच्या नियमांची वर्षभर प्रामाणिक अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे.

नागरिकांनी जबाबदारी ओळखली तरच वाहतूक सुरक्षेचे कायमस्वरूपी कवच निर्माण होऊ शकेल, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगावदेवी येथे वाहतूक सुरक्षा या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी वरठी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंचावर मुख्याध्यापक राजकुमार बांते, पोलीस विभागातील कर्मचारी राजेश वैद्य, रामरतन खोकले, संदीप बांते, प्रदीप कुंभरे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, विविध साधनांद्वारे आपण दैनंदिन प्रवास करतो. त्या साधनांच्या साहित्याची काळजी घेतली पाहिजे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केला जावा. वेग नियंत्रणात ठेवावा तसेच दवाखाने व शाळेजवळ जोराने हॉर्न वाजवू नका.

अपघात झाला तर आधी जखमीला इस्पितळात न्यावे असे सांगून बस, ट्रेनमध्ये कसे चढले पाहिजे याची माहिती देण्यात आली. सिग्नल झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावर असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्या याचीही माहिती देण्यात आली. जीवनाची सुरक्षा आपल्या हाती आहे असे सांगून इयत्ता दहावी हे जीवनातील महत्वाचे वळण आहे. त्यामुळे जपून वागा, खूप अभ्यास करा, असाही सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी केले. संचालन सहायक शिक्षक हेमराज राऊत तर आभार प्रदर्शन हंसराज भडके यांनी केले.