शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर पोलिस ठाण्यात पोलीसांची अर्धेअधिक पदे रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST

जनतेच्या जीवीताची व मालमत्तेला योग्यरित्या संरक्षण द्यावे, गुन्हेगारांवर वचक बसावा, परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी तसेच कायद्याचे राज्य प्रस्थापित ...

जनतेच्या जीवीताची व मालमत्तेला योग्यरित्या संरक्षण द्यावे, गुन्हेगारांवर वचक बसावा, परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी तसेच कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, यासाठी गृह विभागाद्वारे पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली आहे. तुमसर पोलीस ठाण्याला दीड लाख लोकसंख्येसाठी १०५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असतांना केवळ ५५ पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर ५० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची जागा अजूनही रिक्त आहे. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा आलेख पाहता तुमसर पोलीस ठाण्यात असलेला अपुरू अधिकारी व कर्मचारी वर्गामुळे पोलिसांच्या कामाचा व्याप आपसूकच वाढला आहे. यामुळे पोलिसांना कर्तव्य बजावताना तारेवरची कसरतच करावी लागते. अपुऱ्या संख्याबळामुळे २४ तास काम करावे लागत असल्याने त्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. याशिवाय दैनंदिन कामकाजाकरिता जसे स्टेशन डायरी, वायरलेस, वाहतूक पोलीस, कोर्ट पैरवी, समन्स वॉरंट, चालक असे अर्धे कर्मचारी कर्तव्यावर ठेवावे लागतात. त्यातल्या त्यात बंदोबस्त, महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा, उत्सव व यात्रा, आंदोलने, नेत्यांचे दौरे, सभा संमेलने, या ठिकाणी याच संख्याबळातून सुरक्षा प्रदान करावी लागत आहे. परिणामी संख्याबळाअभावी तुमसर पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे, अवैध दारु विक्री, अवैध रेती तस्करी, उत्खनन व वाहतूक यावर वचक नसते व अवैध धंदे फोफावण्यास न कळत वाव मिळत आहे. तपासावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसते आहे. या कडे लोकप्रतिनिधी कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. उलट हे सर्व पोलिसांनीच करायला पाहिजे हे त्यांचे काम आहे, यासर्व बाबतीत पोलिसांनाच दोषी ठरवून त्यांच्या नावांची बोंब लोकप्रतिनिधींकडून मारली जाते. मात्र पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होतांना दिसत नाही, हे अजूनपर्यंत न उकलणारे कोडे ठरले आहे. परंतु या जनहिताच्या प्रश्नांकडे गांभीर्यपुर्वक लक्ष पुरवून तुमसर पोलीस ठाण्यात रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे