शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

मोहाडीचे ग्रामीण रुग्णालय समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

मोहाडी : येथील सुसज्ज इमारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सध्या सामान्य आरोग्य केंद्रापेक्षाही वाईट झाली असून समस्येचे माहेरघर बनले ...

मोहाडी : येथील सुसज्ज इमारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सध्या सामान्य आरोग्य केंद्रापेक्षाही वाईट झाली असून समस्येचे माहेरघर बनले आहे. एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध असूनसुध्दा (ओपीडी) बाह्यरुग्ण विभाग अनेक वर्षांपासून आयुष डॉक्टरांच्या हवाली करण्यात आले आहे. तर एमबीबीएस डाॅक्टर आठवड्यातून फक्त दोन दिवस तोंड दाखविण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. एक डाॅक्टर तर कोरोना काळात सहा महिने आल्याच नाही. मात्र त्यांच्यावर कारवाई तर सोडाच उलट त्यांचा पूर्ण वेतन काढण्यात येऊन त्यांना न येण्याचे बक्षीस देण्यात आल्याची माहिती आहे.

मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालय तालुक्यासाठी वरदान ठरेल असे येथील जनतेला वाटले होते, मात्र अनेक वर्षांपासून या रुग्णालयात रुग्णाची समस्या सोडविण्याऐवजी रुग्णालयाचीच समस्याच जास्त आहे. या रुग्णालयात डाॅ. योगिनी भैसारे आणि अधीक्षक डाँ. ब्रम्हानंद चव्हाण हे दोघे नियमित डाॅक्टर आहेत. डाॅ. पूनम शहारे, डाॅ. प्रताप गोंधुळे हे कंत्राटी डाॅक्टर आहेत. या रुग्णालयात चार एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी असूनही आजपर्यंत यातील एकाही डाॅक्टरने बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासण्याचे कार्य केलेले नाही किंवा आजही करीत नाही. तालुक्यातील फक्त गरीब, मजूर व शेतकरी असलेले रुग्णच या रुग्णालयात येत असल्याने त्यांना तपासण्याचे काम आयुष विभागातील कंत्राटी डाॅ. राजेंद्र सोनवाने व डाॅ. शिल्पा टांगले तुमसरे यांच्याकडे देण्यात आले आहे. यापैकीही कधी कधी फक्त एकच डाॅक्टर ओपीडीमध्ये असतो व दुसऱ्या डॉक्टरची सेवा रात्रपाळीसाठी देण्यात येते. रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. 'रेफर टू भंडारा' येथील ब्रीद वाक्य आहे. या रुग्णालयातील एक डाॅ. योगिनी भैसारे या आठवड्यातून फक्त दोन दिवस, चार, पाच तासासाठी येतात. कोरोना काळात जेव्हा जनतेला डॉक्टरांची खरेच आवश्यकता होती तेव्हा डा. भैसारे जवळपास सहा महिने रुग्णालयात आल्याच नाहीत. तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आली नाही. एवढेच काय तर त्यांना मिळालेले शासकीय निवास त्यांनी एका डाॅक्टरला किरायाने दिले आहे. तर रुग्णालयातील एका लिपिकाने आपला बस्तान मागील दीड वर्षापासून रुग्णालयातच मांडला असून तो इतरत्र राहण्याऐवजी रुग्णालयातच राहत आहे. रुग्णालयाचे शासकीय निवास अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले नसतांना एका डाॅक्टरला दोन खोल्या देण्यात आल्या आहेत. असा अजब कारभार या रुग्णालयात सुरू आहे. इतरही डाॅक्टरांचे तसेच आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांना एमबीबीएस डाॅक्टरअभावी योग्य उपचार प्राप्त होत नसल्याने त्यांना नाईलाजाने खासगी डॉक्टरकडे जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून जनप्रतिनिधींना व सरकारला दोष दिल्या शिवाय राहवत नाही. त्यामुळे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.