शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

आधुनिकीकरणात बैलांचे गोठे पडले ओस !

By admin | Updated: September 11, 2015 01:01 IST

बैलांवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून पोळा या सणाचे महत्त्व आहे. या दिवशी बळीराजा आपल्या 'सर्जा-राजा'ची यथोचित पूजा करून कृतज्ञ होण्याचा प्रयत्न करतो; ....

हिस्से वाटणीमुळे शेतीचा वाटा झाला कमी : चारा टंचाईमुळेही पशुधन पाळणे झाले कठीणदेवानंद नंदेश्वर भंडाराबैलांवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून पोळा या सणाचे महत्त्व आहे. या दिवशी बळीराजा आपल्या 'सर्जा-राजा'ची यथोचित पूजा करून कृतज्ञ होण्याचा प्रयत्न करतो; मात्र आताच्या आधुनिक युगात बैलांचे महत्त्व व उपयोगिता कमी होत चालली आहे. परंपरा कायम असली तरी वास्तवात बळीराजाचे वैभव असलेले गोठे ओस पडू लागले आहे. परिणामी करपलेली शेती-हरपलेला बळीराजा, अशी भयावह अवस्था ग्रामीण भागात नजरेस पडत आहे.शासन दरबारी भंडारा जिल्ह्यात एक लाख ३ हजार ५९७ बैलांची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र बैलांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे. बैल हा शेती व्यवस्थेचा कणा आहे. त्याला पोळ्याच्या दिवशी सजवले जाते. सर्जा-राजाच्या जोडीला बळीराजाची घरच्या लक्ष्मीकडून पूजा होते. शेतीच्या मशागतीसाठी जुंपलेली बैलजोडी व त्यांच्यासोबत कष्ट करणारा बळीराजा या सवंगड्यांचं जिवा-भावाचं नातं असतं. सकाळी सकाळी गोठ्यातील बैल सोडून त्यांना सोबत घेऊन शेतशिवारात जाण्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते; पण आता त्याचे प्रमाण कमी झालेले आहे.वाढते शहरीकरण व विभक्त कुटुंबपद्धतीसह आधुनिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत चालली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेतीचे तुकडे झाल्याने शेतकरी अल्पभूधारक होत आहेत. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नात होऊन पशुधन पाळणे अवघड होत आहे. घटलेले शेती क्षेत्र, चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न, खाद्याचे वाढणारे दर यामुळेही बैल सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आधुनिकीकरणाच्या युगात कृषिक्षेत्रातही मोठे बदल घडू लागले आहेत. शेतजमिनीवर बैलांचे पाण्याचा मान असायचा, तो काळ मागे पडला. आता तर शेतीच्या कामात नांगरण, वखरण, पेरणी, फवारणी अशी सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. कृषिकार्यात यांत्रिकीकरण आल्याने पारंपरिक औजारांची जागा यंत्राने घेतली. बैलजोडीद्वारे दिवसभर चालणारी कामे काही तासांतच होऊ लागली. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन वेळ व श्रमही कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देत आहेत. या ट्रॅक्टरने इतरांची कामे केल्यास आर्थिक उत्पन्नातही भर पडते. त्यामुळेच ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात आहे. वाढत्या महागाईबरोबर बैलजोडी पाळणे, त्यांची निगा राखणे, दररोज चारा उपलब्ध करणे, खाद्य पुरविणे या बाबी आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बळीराजाकडे बैल पोसण्याचे प्रमाण कमी-कमी होत चाललेले आहे. काही मंडळी ही उदरनिवार्हासाठी बैलजोडीचा उपयोग म्हणून बैलांना पोसत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची वाढत चाललेली संख्या, मशागतीसाठी यंत्राचा वापर, चारा उपलब्धतेत होणारी घट व बैलांचे संगोपण करणे अवघड बनत असल्याने शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शासन दरबारी जिल्ह्यात एक लाख ३ हजार ५९७ बैलांची नोंद आहे.