शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाइल ॲप लावणार वाहन अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

भंडारा : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक मृत्युमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, ...

भंडारा : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक मृत्युमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, घटनास्थळावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना करून अपघातांना ब्रेक लावण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला. भंडारा जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघात टाळण्यासाठी शोधून काढलेले हे ॲप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा ठाणेदार हा ॲडमिन तर बाकीचे अधिकारी, कर्मचारी हे फिल्ड ऑफिसर म्हणून यामध्ये काम करण्यात आले आहे. ॲडमिनची एक युजर आयडी असते. तो त्या गाडीत किती अपघात घडले याची नोंद घेण्यात आली किंवा नाही हे स्वतः पाहत असतो.

या नवीन ॲपच्या मदतीने अपघात रोखण्यास निश्चितच मदत होणार आहे. राज्य मार्गावर रस्त्याचे काम उत्तम झाले असले तरी अपघाताचे प्रमाण मात्र घटले नाही. उलट त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. या वाढत्या अपघातांना नियंत्रित करण्यासाठी आयआरडी प्रकल्प राबविला जात आहे. हे एक साॅफ्टवेअर आहे. त्यामध्ये अपघाताची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे.

आतापर्यंत १५८ अपघातांची नोंद

भंडारा जिल्ह्यात सन २०२१च्या सहा महिन्यांत १५८ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. १८५ लोक जखमी असल्याचे पुढे आले आहे. कोरोनामुळे संचारबंदी असली तरीदेखील अपघाताची संख्या सहा महिन्यांत शेकडोंच्या घरात गेली आहे. भंडारा जिल्ह्यात सन २०१९ मध्ये १२२ अपघात घडले होते. यात ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ९२ जण जखमी झाले होते. सन २०२० मध्ये १३१ अपघात झाले होते. यात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ११८ लोक जखमी झाले आहेत.

असा करणार अभ्यास

मोबाइल ॲपवर एखाद्या अपघाताची नोंद झालेली नसेल तर त्याची नोंद फिल्ड ऑफिसर घेईल. अपघाताचे कारण काय आहे, त्यावर अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्री अपघात झाला तर त्या घटनास्थळावर लाइट होती किंवा नव्हती याचा अभ्यास केला जाणार आहे.

वाहनांना समोरचे वाहन दिसले किंवा नाही. लाइट लावण्याची गरज आहे का, पुलावर अपघात घडला असेल तर त्या पुलावर कठडे होते किंवा नाही. कठडे लावण्याची गरज आहे का, तसेच घटनास्थळाचे लाइव्ह लोकेशन त्या घटनास्थळाचा अक्षांश आणि रेखांश या ॲपमधून दिसणार आहे. एकंदरीत अपघातावर आळा घालण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे.

आता नव्याने अपघाताची नोंद होणार

पूर्वी अपघात घडल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग अपघातग्रस्त स्थळावर प्रत्यक्ष पाहणी करीत होते आणि संबंधितांना माहिती देत होते. आता ही संपूर्ण माहिती आयआरएडी साॅफ्टवेअर डाऊनलोड होणार आहे. अद्ययावत प्रणालीमध्ये सध्या तरी कुठलीही माहिती डाऊनलोड झालेली नाही. पुढील काळात ही माहिती भरली जाणार आहे.