शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनात वाणीची प्रतिष्ठा असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

जवाहरनगर पेट्रोलपंप येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात युजीसी दिल्ली पुरस्कृत महात्मा गांधीचे अभ्यास केंद्राद्वारे गांधी विचारधारा आणि ग्रामस्वराजची संकल्पना या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू बोलत होते.

ठळक मुद्देसिद्धार्थ काणे : ठाणा येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : मानवी मन विचलीत असतो. त्याला स्थिर राहण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचाराची आवश्यकता आहे. आपण महात्मा गांधीन बघितले नाही, पण त्यांचे विचार आत्मसात करून दैनंदिन जीवनात वापर केल्यास महात्मा गांधींना पाहल्यासारखे वाटेल. असत्य भाषाने कार्य करू नका. यासाठी जे मनात विचार आहे, त्या मनात वाणीची प्रतिष्ठा असावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी केले.जवाहरनगर पेट्रोलपंप येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात युजीसी दिल्ली पुरस्कृत महात्मा गांधीचे अभ्यास केंद्राद्वारे गांधी विचारधारा आणि ग्रामस्वराजची संकल्पना या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव तथा रातुम नागपूर विद्यापीठाचे विद्वत परिषदेचे माजी सचिव डॉ. जी.डी. टेंभरे, मॉरिशस येथील महात्मा गांधी संस्थान व टेलीव्हिजन प्रवक्ता डॉ. अंचराज संध्या देवी, नेपालचे प्रख्यात कवि व साहित्यकार राजेंद्र गुरागाई, संस्था अध्यक्ष युगकांता रहांगडाले, प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी उपस्थित होते.डॉ. अंचराज संध्यादेवी म्हणाले, महात्मा गांधी व्यासपिठाच्या माध्यमातून गांधीजीचे विचार घेवून चांगले सुसंस्कार घडवा. आजघडीला महात्मा गांधीचे विचार सर्वांना प्रेरणादायी ठरते. मॉरिशसला गांधीजींच्या अहिसांचे विचाराने प्रेरित होऊन माणूस जोडण्याची कामे झाली. मॉरिशसला आंतरिक स्वातंत्र्य निर्मितीस हातभार लागला. गुरागाई म्हणाले की, नेपालची जनता महात्मा शांतीचे विचार अगोदरच शांतीदूत बुद्धाच्या रूपात प्राप्त झाले आहेत. यात गांधीजींच्या विचाराची भर पडली आहे. आम्ही पूर्णपणे महात्मा गांधी बनू शकत नाही, पण त्यांचे विचार जनमाणसात रूजवून माणुसकी निर्माण करू शकतो. जन्माने कुणी महात्मा बनत नाही तर त्यांच्या प्रगट कर्तृत्ववानाने बनतो. त्यातलेच महात्मा गांधी होत.सातासमुद्रापलीकडील माणसं जोडण्याचे विचार महात्मा गांधीच्या विचारात आहे. डॉ. जी.डी. टेंभरे म्हणाले की, परमाणू शस्त्रापेक्षा अहिंसारूपी महात्मा गांधी यांचे वैचारिक विचाराचे शस्त्राचा वापर केल्यास शांती, सद्भाव नांदेल यात दुमत नाही. या व्यासपीठाच्या माध्यमातून महात्मा गांधीचे विचार प्राध्यापक वर्गानी विद्यार्थ्यांमध्ये रूजवावे हिच खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पर्वानिमित्त सार्थक ठरेल, असेही ते म्हणाले.दुपारच्या पहिल्या सत्रात फतेहाबाद येथील हिंदी विद्यालय शिक्षण विभागाचे प्रवक्ता डॉ. सत्यनारायण यांच्या अध्यक्षतेखाली मनोज पांडे यांनी ‘गांधी विचार आणि ग्राम स्वराज्य’ या विषयावर शोध निबंधाचे वाचन केले. तत्पूर्वी विविध ठिकाणाहून आॅनलाईन शोध निबंधाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी तर आभार डॉ. राजेंद्रप्रसाद पटले यांनी मानले.