शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
3
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
4
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
5
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
6
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
7
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
8
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
9
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
10
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
11
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
12
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी
13
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
14
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
15
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
16
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
17
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
18
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
19
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
20
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा

चंद्रपुरात लाखो लिटर पाण्याचा उपसा

By admin | Updated: May 22, 2016 00:30 IST

चंद्रपूर शहरासाठी असलेली पाणीपुरवठा योजना पांगळी असल्याने भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होत आहे.

पाणीपुरवठा योजना पांगळी : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावलीचंद्रपूर: चंद्रपूर शहरासाठी असलेली पाणीपुरवठा योजना पांगळी असल्याने भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खालावत चालली आहे. नजीकच्या काळात उपाययोजना करण्यात न आल्यास चंद्रपूरचे लातूर होण्यास वेळ लागणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरात विविध स्त्रोताद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खालावत आहे. शहरात जवळपास ८० हजार घरे आहेत. शहरासाठी असलेली पाणी पुरवठा योजना सक्षम नसल्याने शहरातील किमान ३५ हजार घरांमध्ये विहिरी, ट्यूबवेल, हातपंप यासारखे पाण्याचे स्त्रोत आहेत. चंद्रपुरात असलेली पाणीपुरवठा योजना सन १९६४ ला कार्यान्वित झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ एक लाखापर्यंत होती. ही लोकसंख्या लक्षात घेऊन सदर योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र लोकसंख्येचा विस्तार पाहता १९८५ मध्ये चंद्रपूर शहरासाठी सुधारित नळयोजनेला मंजुरी देण्यात आली. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही योजना पुर्णत्वास येऊ शकली नाही. १९९६ पुन्हा नळयोजना मंजूर झाली. मात्र तीदेखील विविध कारणांनी रेंगाळली. चंद्रपूर शहराची लोकसंख्या वेगाने वाढली. आज घडीला चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे. मात्र ४२ वर्षे जुन्या पाईनलाईनच्या आधारेच पाणी पुरवठा केला जात आहे. ही योजना अतिशय दुबळी झाली असून या नळयोजनेद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांनी स्वत:च्या सोईसाठी आपल्या घरी ट्यूबवेल, हातपंप विहीरी खोदल्या. त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला दररोज एक हजार लिटर पाण्याची गरज लक्षात घेता, शहरातील किमान ३५ हजार घरांमधून विविध स्रोताद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. नव्या वसाहती तहानलेल्याचचंद्रपूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या आसपास नव्या वसाहती उभ्या झाल्या आहेत. मात्र या नव्या वसाहतीपर्यंत नळयोजनेचे पाणी अद्यापही पोहचले नाही. जमिनीतील पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्षार असल्याने ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळे या नव्या भागातील नागरिकांना दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. अमृत कलश योजनेची प्रतीक्षाकेंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त नियोजनातून अमृत कलश योजना उदयास आली आहे. सामान्यांना मुबलक पाणी मिळावे या हेतून ही योजना चंद्रपुरातही कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र ही योजना नेमकी कधी कार्यान्वित होईल, हे आताच सांगता येणार नाही. योजना कार्यान्वित करण्यासाठी महानगर पालिकास्तरावर कार्यवाही केली जात आहे. ही योजना चंद्रपुरात कार्यान्वित झाल्यास पाणी वितरण व्यवस्था सक्षम होऊन प्रत्येकाला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. कोळसा खाणींमुळे घटतोय जलस्तरचंद्रपूर शहराला कोळसा खाणींचा वेढा आहे. पद्मापूर, लालपेठ, माना आदी कोळसा खाणींचा परिणाम भूगर्भातील जलसाठ्यावर होत आहे. कोळशामुळे जमिनीत उष्णता तयार होत असल्याने भूगर्भातील जलस्तर वेगाने घटत चालला आहे. इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होतो. धरणामध्ये पाणी मुबलक आहे. परंतु शहरातील वितरण व्यवस्था दुबळी ठरली आहे. शहरातील पाईप लाईनचे जाळे खूप जुने आहे. लोकसंख्या वाढल्याने नळजोडणीही मोठ्या प्रमाणात झाली. परंतु अजुनही कमी व्यासाच्या पाईप लाईनमधूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. काही लोकांना मुबलक पाणी तर अनेकांच्या नळाला पाण्याचा थेंबही येत नाही. ही परिस्थिती बदलविण्यासाठी शहरात सक्षम पाणी वितरण व्यवस्था आवश्यक आहे. यासंदर्भात मी स्वत: पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे.- संजय वैद्य, संयोजक, जल बिरादरी