शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे चुकारे अडले

By admin | Updated: January 24, 2015 22:49 IST

आधारभूत धान खरेदी केंद्राला धान विक्री केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना येरझाऱ्या घालाव्या लागत आहे. सात दिवसाच्या आत चुकारे देण्याची शासनाचे नियम आहे.

साकोली : आधारभूत धान खरेदी केंद्राला धान विक्री केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना येरझाऱ्या घालाव्या लागत आहे. सात दिवसाच्या आत चुकारे देण्याची शासनाचे नियम आहे. मात्र या नियमांना बगल देत कोट्यवधी रूपयाचे चुकारे थकीत असल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.आॅपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन व सबएजंट असलेल्या श्रीराम भात गिरणीमधील आधारभूत धान खरेदी केंद्राने परिसरातील शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली. या केंद्रावर शेतकऱ्यांनी धान दिल्यानंतर सात दिवसात शेतकऱ्यांना चुकारे मिळायला पाहिजे, असा नियम आहे. मात्र किचकड पद्धतीमध्ये दुसऱ्याला विलंब होतो. यात बदल करणे गरजेचे आहे. श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली केंद्रावर १६ जानेवारीपर्यंत २३ हजार ९७९ क्विंटल व विर्शी केंद्रावर १४ हजार ३१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. तर २० डिसेंबरपर्यंत साकोली केंद्रावर २ कोटी ३२ लाख १७ हजार रूपये, विर्शी केंद्रावर १ कोटी १९ लाख ३७ हजार रूपयाचे धान खरेदी करण्यात आले.यापैकी साकोली केंद्रावर ९३ लाख ९२ हजार ८४० रूपये, विर्शी केंद्रावर ७५ लाख ३३ हजार रूपयाचे धानाचे चुकारे बाकी आहेत. श्रीराम भात गिरणी व्यवस्थापनाच्या वतीने २२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०१४ व एक, पाच, दहा व चौदा जानेवारीला बँकेत देण्यात आल्या. एक महिन्याचा कालावधी लोटूनही दिलेल्या हुंड्या मार्गी लागल्या नाही. चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या येरझारा चालू आहे. (तालुका प्रतिनिधी)