शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पारा @ ४४ ; नवतपापूर्वीच तापतोय भंडारा

By admin | Updated: April 18, 2017 00:37 IST

उष्णतेची लाट दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे.

भाजीपाल्यांचे दरही वाढले : उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल, रस्ते निर्मनुष्यइंद्रपाल कटकवार भंडाराउष्णतेची लाट दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. दरवर्षी मे महिन्यात पारा ४४ अंशांच्यावर पोहोचतो. मात्र यंदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या प्रारंभीच पारा ४५ अंशांवर पोहोचला आहे. नवतपापूर्वीच भंडारा जिल्हा तापू लागला आहे. यंदाचा उन्हाळा जीवघेणा आहे की काय? असे वाटू लागले आहे. सकाळी ९ वाजतापसून सुरू झालेली उन्हाची प्रखरता सायंकाळी ५ वाजतापर्यंत कायम राहत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर बघायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र उन्हाची तीव्रता जास्त व एप्रिल महिन्यातच अनुभवायला मिळत आहे. २२ मार्च हा अयनदिन म्हणून ओळखला जातो. यादिवसापासुन सुर्य हा पृथ्वीच्या मधोमध असतो तथा याच दिवसापासून सुर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. एप्रिलचा उत्तरार्ध सुरू होताच सूयार्ने अक्षरश: आग ओकण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मागील दोन दिवसांपासून पारा सातत्याने चढत आहे. रविवारी भंडाऱ्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारलाही पारा ४४ अंशांवर होता. उष्णतेच्या लाटेने नागरिकांची होरपळ होत असून, बुधवारपर्यंत ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असतो. यावषीर्चा उन्हाळा मागील सर्व विक्रम मोडीत काढणार, असा कयास व्यक्त केला जात होता. यावर्षी ६ मार्चला पारा ४३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. मागील वर्षी म्हणजे मे २०१६ मध्ये पाऱ्याने चाळीशी ओलांडत १४ मे रोजी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी एक महिन्यापूर्वीच पारा ४५ अंशांवर गेल्याने मे महिन्यात उन्हाची तीव्रता किती राहील याचा विचार न केलेलाच बरा. मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअसच्या घरात होते. सन २०१५ मध्ये २१ मे रोजी तापमान ४६.५ अंश नोंदविण्यात आले होते. यावर्षी तापमानाचा हा उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील चार दिवसांपासून मात्र उष्णतेची लाट पसरल्याने तापमापीतील पारा झपाट्याने वर सरकला आहे. शुक्रवारी भंडाऱ्याचे तापमान ४३.५, शनिवारी ४४ तर रविवारी पारा ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. रविवारी व सोमवारी दुपारी उन्हाची प्रखरता एवढी होती, की शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. रविवार हा भंडाराचा आठवडी बाजाराचा दिवस होता, परंतु सायंकाळी ६ वाजतानंतरच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून आली. नवतपा २५ मे पासूनसंपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरिकांची होरपळ होत असून, उन्हाच्या दाहकतेने जीवाची काहिली होत आहे. मे महिन्याच्या २५ तारखेपासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. नवतपा प्रारंभ व्हायला सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे परंतु भंडारेकर नवतपातील उन्हाची दाहकता एप्रिल महिन्यातच अनुभवत आहेत.