शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

शेतकऱ्यांच्याच बारदानात धान मोजमाप करून अविलंब खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. सुरुवातीला धान खरेदीसाठी मुहूर्त निघत नव्हता आणि धान खरेदी ...

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. सुरुवातीला धान खरेदीसाठी मुहूर्त निघत नव्हता आणि धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर बारदान उपलब्ध नसल्याने धान खरेदी करता येत नव्हती. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या क्षमतेनुसार बारदान आणि इतर गोष्टी खरेदी करण्याची परंपरा होती. जिल्ह्याच्या पणन अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी होती. मात्र ही जबाबदारी राज्य सरकारने काढून घेतली. त्यामुळे कमिशनखोरांना कमिशनची चिंता अधिक होती आणि त्यामुळे बारदान खरेदीच्या आवश्यक बाबीकडे दुर्लक्ष झाले. बारदानाचे कंत्राट कोलकाताच्या कंपनीकडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे बारदान येण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले.

शासनाकडे बारदान नसल्यामुळे धान खरेदी करता येत नसणे ही दयनीय स्थिती आहे. खिशात पैसे नसलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. उघड्यावर धान असल्यामुळे शेतकऱ्यांना धान खराब होण्याची भीती आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहेत, सहा महिन्याआधी शेतकऱ्यांनी नोंदणी करीत उन्हाळी धान लावला. या सहा महिन्यात ढिसाळ प्रशासनाला बारदानाची व्यवस्था करता आली नाही. या राज्य शासन व प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा निर्धार ग्रामआंदोलन समितीचे महेंद्र निंबार्ते, संजय भोले, महेश गिऱ्हेपुंजे, मंगेश वंजारी, बळीराम गिऱ्हेपुंजे, नंदू रणदिवे, प्रकाश वंजारी, सचिन पंचबुद्धे, भगवान वंजारी, विजय सार्वे, चंद्रमणी किंदर्ले, मयूर गोमासे, आकाश वंजारी, गणेश किंदर्ले, देवा बडोले आणि शेतकऱ्यांनी केला आहे.