शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांच्याच बारदानात धान मोजमाप करून अविलंब खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. सुरुवातीला धान खरेदीसाठी मुहूर्त निघत नव्हता आणि धान खरेदी ...

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. सुरुवातीला धान खरेदीसाठी मुहूर्त निघत नव्हता आणि धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर बारदान उपलब्ध नसल्याने धान खरेदी करता येत नव्हती. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या क्षमतेनुसार बारदान आणि इतर गोष्टी खरेदी करण्याची परंपरा होती. जिल्ह्याच्या पणन अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी होती. मात्र ही जबाबदारी राज्य सरकारने काढून घेतली. त्यामुळे कमिशनखोरांना कमिशनची चिंता अधिक होती आणि त्यामुळे बारदान खरेदीच्या आवश्यक बाबीकडे दुर्लक्ष झाले. बारदानाचे कंत्राट कोलकाताच्या कंपनीकडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे बारदान येण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले.

शासनाकडे बारदान नसल्यामुळे धान खरेदी करता येत नसणे ही दयनीय स्थिती आहे. खिशात पैसे नसलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. उघड्यावर धान असल्यामुळे शेतकऱ्यांना धान खराब होण्याची भीती आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहेत, सहा महिन्याआधी शेतकऱ्यांनी नोंदणी करीत उन्हाळी धान लावला. या सहा महिन्यात ढिसाळ प्रशासनाला बारदानाची व्यवस्था करता आली नाही. या राज्य शासन व प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा निर्धार ग्रामआंदोलन समितीचे महेंद्र निंबार्ते, संजय भोले, महेश गिऱ्हेपुंजे, मंगेश वंजारी, बळीराम गिऱ्हेपुंजे, नंदू रणदिवे, प्रकाश वंजारी, सचिन पंचबुद्धे, भगवान वंजारी, विजय सार्वे, चंद्रमणी किंदर्ले, मयूर गोमासे, आकाश वंजारी, गणेश किंदर्ले, देवा बडोले आणि शेतकऱ्यांनी केला आहे.