शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी बजेट व्हावे

By admin | Updated: December 3, 2015 00:53 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटले असले तरी शेतकरी आजही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे.

नाना पटोले : अधिवेशनात मागणी रेटणारभंडारा : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटले असले तरी शेतकरी आजही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणत्याही सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र कृषी बजेट व्हावे, अशी मागणी अधिवेशनात रेटणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली.नाना पटोले म्हणाले, स्वतंत्र कृषी बजेटसाठी ६५ खासदारांचा एक गट तयार केला असून सरकारचे लक्ष केंद्रीत करणार आहे. वेगळे बजेट, आर्थिक बजेट, स्वतंत्र बजेट होत असतात तर कृषी प्रधान देशात स्वतंत्र कृषी बजेट का नाही, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. गत चार-पाच वर्षापासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. दुष्काळावर शासन काय उपाययोजना करणार हा प्रश्न अधिवेशनात विचारला जाईल.शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबविल्या जातील या बाबीकडे शासनाचे लक्ष केंद्रित करणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव निश्चित करण्यासाठी शेतीला लागणारा खर्च व होणारे उत्पादन याचा आराखडा तयार केला आहे. तो अधिवेशनात सादर करण्यात येईल. शेतकरी कुटूंबात जन्म झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून बघितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव निश्चित करणारा भारतात ३५ टक्के सिंचन व्यवस्था आहे. अद्यापही ६५ टक्के सिंचन व्यवस्था करण्याचे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांसाठी ६५ टक्के सिंचन व्यवस्था झाली तर त्यांना निसर्गावर विसंबून राहावे लागणार नाही. शेतकरी आत्महत्या थांबतील, कर्जबाजारी होणार नाही, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)