शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
3
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
4
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
5
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
6
'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
7
सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
8
Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
9
Pankaja Munde: "मला आणि धनंजय मुंडेंना सतत बहीण-भाऊ' म्हणणं थांबवा!" पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
10
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
11
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
12
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
13
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
14
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
15
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
16
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
17
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
18
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
19
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
20
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पट योजनेत अनेकांना गंडविले

By admin | Updated: September 11, 2014 23:17 IST

पुणे येथील एका कंपनीचे एजंट असून ही कंपनी लक्षावधीचे कर्ज वितरीत करतो असे सांगून एजंटांनी सिहोरा परिसरातील ५० हून अधिक नागरिकांना गंडविले आहे. या एजंट विरोधात कुठलाही

एजंटांचे गोंदिया कनेक्शन : सिहोरा परिसरात बोगस एजंटचुल्हाड (सिहोरा) : पुणे येथील एका कंपनीचे एजंट असून ही कंपनी लक्षावधीचे कर्ज वितरीत करतो असे सांगून एजंटांनी सिहोरा परिसरातील ५० हून अधिक नागरिकांना गंडविले आहे. या एजंट विरोधात कुठलाही पुरावा नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे टाळण्यात येत आहे. अशी माहिती सुशिल कुंभारे यांनी दिली.ग्रामीण भागात दाम दुप्पट योजना राबविणाऱ्या अनेक कंपन्यांचे एजंट सक्रीय झालेली आहेत. संबंधित व्यक्ती, नातेसंबंध आदींचा परिचय देत आहेत. कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभांची माहिती हे एजंट ग्रामीण जनतेला पटवून देत आहेत. अल्पावधीत राशी दुप्पट करण्यात येत असल्याने या एजंटांच्या जाळ्यात अनेक नागरिक ओढली जात आहे. या आधी एका महिलेने चक्क महिला बचत गटांना गंडविले आहे. नंतर ही महिला गोंदिया जिल्ह्यात पसार झाली आहे. या महिलेचा आजवर थांगपत्ता लागलेला नाही. बचत गटाकडे पुरावा नसल्याने महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नाही. या प्रकरणाची चर्चा शांत होत नाही. अनेक नागरिकांना एका एजंटाने गंडविले असल्याचे प्रकरण उघडकीस आलेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील रहिवासी असल्याचे सांगून साई प्रसाद प्रॉपर्टी लिमिटेड पुणे या कंपनीत कार्यरत असल्याची माहिती या एजंटाने सिहोरा परिसरातील नागरिकांना दिली. आधी या एजंटाने नाते संबंधात असलेल्या आप्तस्वकीयांना दाम दुप्पट योजनेत गुंतवणूक करण्याचे सांगितले. १ लक्ष रुपयाचे कर्ज प्राप्तीसाठी ४ हजार रुपये आणि ५० हजार रुपयासाठी २ हजार रुपये असे कर्जवाटपाची माहिती दिली. त्याप्रमाणे ५० हून अधिक नागरिकांनी या एजंटाकडे राशी जमा केली. एप्रिल महिन्यात राशी गुंतवणूक केली असताना एजंटाने कर्जप्राप्तीकरिता प्रयत्न केले नाही. फसवणूक करण्यात येत असल्याची बाब लक्षात येताच, तिरोडास्थित असलेल्या एजंटाचे घर नागरिकांनी गाठले. आज उद्या तुम्हाला कर्ज प्राप्त करून देतो. अशा हुलकावण्या देत या एजंटाने पाच महिन्याच्या कालावधीत साधा एक रुपयाहीनागरिकांना प्राप्त करून दिला नाही. यानंतर नागरिकांनी एजंटाच्या भ्रमणध्वनी क्रमांक अस्तित्वात नाही असे उत्तर प्राप्त होत असल्याने एजंटाने फसवणूक केल्याची खात्री नागरिकांची झाली आहे. या एजंटाचे घर गाठण्याचे नागरिकांनी सुरु केले आहे. गेल्या महिनाभरापासून एक एजंट घरीच राहत नाही. या एजंटाच्या बाबतीत सत्य माहिती सांगण्यात येत नाही. यामुळे एजंट लाखोंचा चुना लावून पसार झाल्याचे कळताच नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी काही पोलिसांना संपर्क साधला. परंतु या एजंटानेच फसवणूक केली असल्याचा पुरावा नागरिकांकडे नाही. यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळले आहे. नागरिकांनी न्याय मिळविण्याची अपेक्षा सोडली आहे. फसवणूकीत अनेक गरीब तथा सामान्य नागरिक अडकली आहेत. १३ कि.मी. अंतरावरील तिरोडा श्हरात एजंटाचे रोज घर गाठण्यात येत आहे. कर्ज प्राप्त करण्याचा विचार नागरिकांनी सोडला असून गुंतवणूक केलेली राशी परत प्राप्तीसाठी धाव घेण्यात येत आहे. परंतु प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती ‘लोकमत’ला सुशिल कुंभारे यांनी दिली आहे. (वार्ताहर)