शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

जातीय सलोखा कायम ठेवा

By admin | Updated: March 23, 2016 00:47 IST

जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टीकोनातून शांतता व जातीय सलोखा कायम ठेवून उत्सव आनंद व उत्साहात साजरे करावे,

समितीची बैठक : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहनभंडारा : जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टीकोनातून शांतता व जातीय सलोखा कायम ठेवून उत्सव आनंद व उत्साहात साजरे करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक विनीता साहू जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस बहुद्देशिय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, भंडारा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तुमसर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले,भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी श्री. देवतळे, भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जोगदड, तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी साळी उपस्थित होते.विनीता साहू म्हणाल्या, जिल्हयात शांतता व सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. या बैठकीत आलेल्या सामाजिक संघटनेच्या सदस्यानी कोणतेही असामाजिक घटना घडू नये याबाबत परिसरात जनजागृती करावी. साकोली येथे हिंदु, मुस्लीम, बौध्द यांच्या संघटनांनी एकाच ठिकाणी भगवा, हिरवा निळया पताका लावून जी सर्वधर्मसमाभावाची भावना जागृत केली हे जिल्हयासाठी प्रशंसनीय बाब आहे. कोठेही असामाजिक घटना घडल्यात तर त्याविषयी पोलीस प्रशासनास तात्काळ कळवावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याविषयी जनतेने सतर्क रहावे. होळीच्या सणात कोणीही रासायनिक युक्त रंगाचा वापर करु नये त्यामुळे शारिरास इजा होते. तसेच अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. याबाबत मुलांना सुध्दा मार्गदर्शन करणे आपली जबाबदारी आहे. उपजिल्हाधिकारी विजया बनकर म्हणाल्या, जनता व प्रशासन यांच्यात सुसंवाद असला पाहिजे. होळीच्या सणादरम्यान महिला छेडछाड प्रकार होऊ नये. त्यासाठी मद्य प्राशन करुन कोणीही रंग खेळू नये तसेच राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने पाण्याचा जपून वापर करावा.पाणी टंचाई सर्वत्र असल्याने नागरिकांनी याचे भान ठेवावे. जिल्हा प्रशासन या घटनावर सुक्ष्म लक्ष ठेवून आहे. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी काबरा यांनी या सणादरम्यान सर्वांनी सदभावनेने वागून सामाजिक बांधिलकी कायम ठेवावी. तसेच प्रत्येक समुदायांनी आपले सण साजरे होताच त्याबाबतचे बॅनर व पोस्टर काढून टाकावे यामुळे समाजात वाद उदभवणार नाही, असे आवाहन केले. अमृत बन्सोड म्हणाले, भंडारा शांतताप्रिय शहर म्हणून प्रसिध्द आहे. असामाजिक तत्वांना चालना देवू नये असे सांगितले. सर्वधमिंर्यानी एकमेकांच्या सणात सहभागी होवून सण साजरे करावे, यामधून एकात्मतेचा संदेश मिळेल, असे उपस्थितांनी सांगितले. शांतता व जातीय सलोखा बैठक तिमाही न ठेवता दर महिन्याला घेण्यात यावी, अशी सूचना केली. यावेळी रशिद कुरेशी, यशवंत थोटे, हिवराज उके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन परिविक्षाधिन पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी तर श्री. साळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला जिल्हयातील शांतता समितीचे सदस्य तसेच पोलीस अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)