शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

संपूर्ण विकास हेच अभियानाचे मुख्य लक्ष्य

By admin | Updated: April 26, 2016 00:27 IST

स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता तथा बेटी बचाओ याकडे शासन व प्रशासनाची करडी नजर आहे.

राजेंद्र निंबाळकर यांचे प्रतिपादन : खापा येथे ‘ग्रामोदय से भारत उदय’ अभियानतुमसर : स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता तथा बेटी बचाओ याकडे शासन व प्रशासनाची करडी नजर आहे. त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर कार्यरत राहून जनतेशी संवाद साधून लक्ष्य साध्य करावे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.ते खापा (तुमसर) ग्रामपंचायतीत आयोजित ग्रामोदय से भारत उदय अभियान या कार्यक्रमात बोलत होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय पंचायत दिन २४ एप्रिल २०१६ या कालावधीत हे उपक्रम राबवित आहे. राजेंद्र निंबाळकर यांनी सामाजिक सलोखा व अभिसरण वृध्दीगत करणे, पंचायत राज संस्थाचे बळकटीकरण करणे, शेतकऱ्यांचा विकास करणे आणि गरीबांचे जिवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश ग्रामोदयचा आहे असे त्यांनी सांगितले.ग्रामसभेला एकूण १०४ सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन सभेला सुरुवात करण्यात आली. संचालन ग्रामविकास अधिकारी डी. बी. सिंदराम, तर आभार राजकुमार माटे यांनी मानले. सभेला तालुका कृषी अधिकारी प्रतिनिधी, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, शाळेतील शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)