राजेंद्र निंबाळकर यांचे प्रतिपादन : खापा येथे ‘ग्रामोदय से भारत उदय’ अभियानतुमसर : स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता तथा बेटी बचाओ याकडे शासन व प्रशासनाची करडी नजर आहे. त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर कार्यरत राहून जनतेशी संवाद साधून लक्ष्य साध्य करावे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.ते खापा (तुमसर) ग्रामपंचायतीत आयोजित ग्रामोदय से भारत उदय अभियान या कार्यक्रमात बोलत होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय पंचायत दिन २४ एप्रिल २०१६ या कालावधीत हे उपक्रम राबवित आहे. राजेंद्र निंबाळकर यांनी सामाजिक सलोखा व अभिसरण वृध्दीगत करणे, पंचायत राज संस्थाचे बळकटीकरण करणे, शेतकऱ्यांचा विकास करणे आणि गरीबांचे जिवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश ग्रामोदयचा आहे असे त्यांनी सांगितले.ग्रामसभेला एकूण १०४ सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन सभेला सुरुवात करण्यात आली. संचालन ग्रामविकास अधिकारी डी. बी. सिंदराम, तर आभार राजकुमार माटे यांनी मानले. सभेला तालुका कृषी अधिकारी प्रतिनिधी, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, शाळेतील शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
संपूर्ण विकास हेच अभियानाचे मुख्य लक्ष्य
By admin | Updated: April 26, 2016 00:27 IST