शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:05 IST

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वाकेश्वर, रावणवाडीसह परिसरातील लाखो शेतकºयांना बसतो आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संघर्ष सुरुच : दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/वाकेश्वर : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वाकेश्वर, रावणवाडीसह परिसरातील लाखो शेतकºयांना बसतो आहे.गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याचा पाटबंधार विभागाकडे सातत्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी संघर्ष सुरू आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने शेतकºयांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका अनेक शेतकऱ्याना यापूर्वीही बसला आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. कालव्याची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी कालव्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाणी तेथेच मुरले जाते तर मोठ्या प्रमाणात पाणी शेतशिवारात इतरत्र पसरत आहे.परंतु शेतकऱ्यानी तक्रार करुनदेखील कर्मचारी फिरकले नसल्याने पाण्याचा अपव्यय आजही सुरुच आहे.वाकेश्वर येथील शेतकरी रवी हलमारे, कार्तिक मस्के, शंकर हटवार, नितेश मस्के यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही कालव्याची दुरूस्ती होवू शकली नाही. ऐन हंगामात पाण्याची गरज असताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरु असल्याने गावकºयांनी मार्ग काढण्याचे ठरवले.न्याय न मिळाल्याने वाकेश्वर येथील गावकºयांनी लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करुन जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवते तर दुसरीकडे गावकरी सहकार्यासाठी तयार असतानाही कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.शेतकºयांनी अधिकाºयांकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यानी मात्र याकडे लक्ष न दिल्याने अद्यापही रावणवाडी कालव्याची दुरूस्ती होवू शकलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांचे धान पीक एक-दोन पाण्यामुळे दरवर्षीच वाया जाते. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता सदर कालव्याची दुरूस्ती आता होवू शकत नसल्याचे सांगून वरिष्ठांना कळवू, असे त्यांनी सांगितले.तलावाला लागून शेती असतांना देखील माझ्या शेतीला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पोहचत नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय आजही होत आहे. पाणी न मिळाल्यास आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहोत.- रवि हलमारे, प्रगतशील शेतकरी वाकेश्वर.

मी काही दिवसांपूर्वी रूजू झाले आहे. सद्यस्थितीत काम करणे अशक्य आहे. कालव्याशेजारी असणाऱ्या मोठ्या झाडांमुळेच कालव्याची दुरवस्था झाली असल्याने याबाबत वनविभागाला कळविले आहे.- एन.एन. कांबळे, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, भंडारा

टॅग्स :environmentपर्यावरण