शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:05 IST

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वाकेश्वर, रावणवाडीसह परिसरातील लाखो शेतकºयांना बसतो आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संघर्ष सुरुच : दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/वाकेश्वर : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वाकेश्वर, रावणवाडीसह परिसरातील लाखो शेतकºयांना बसतो आहे.गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याचा पाटबंधार विभागाकडे सातत्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी संघर्ष सुरू आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने शेतकºयांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका अनेक शेतकऱ्याना यापूर्वीही बसला आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. कालव्याची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी कालव्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाणी तेथेच मुरले जाते तर मोठ्या प्रमाणात पाणी शेतशिवारात इतरत्र पसरत आहे.परंतु शेतकऱ्यानी तक्रार करुनदेखील कर्मचारी फिरकले नसल्याने पाण्याचा अपव्यय आजही सुरुच आहे.वाकेश्वर येथील शेतकरी रवी हलमारे, कार्तिक मस्के, शंकर हटवार, नितेश मस्के यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही कालव्याची दुरूस्ती होवू शकली नाही. ऐन हंगामात पाण्याची गरज असताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरु असल्याने गावकºयांनी मार्ग काढण्याचे ठरवले.न्याय न मिळाल्याने वाकेश्वर येथील गावकºयांनी लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करुन जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवते तर दुसरीकडे गावकरी सहकार्यासाठी तयार असतानाही कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.शेतकºयांनी अधिकाºयांकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यानी मात्र याकडे लक्ष न दिल्याने अद्यापही रावणवाडी कालव्याची दुरूस्ती होवू शकलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांचे धान पीक एक-दोन पाण्यामुळे दरवर्षीच वाया जाते. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता सदर कालव्याची दुरूस्ती आता होवू शकत नसल्याचे सांगून वरिष्ठांना कळवू, असे त्यांनी सांगितले.तलावाला लागून शेती असतांना देखील माझ्या शेतीला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पोहचत नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय आजही होत आहे. पाणी न मिळाल्यास आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहोत.- रवि हलमारे, प्रगतशील शेतकरी वाकेश्वर.

मी काही दिवसांपूर्वी रूजू झाले आहे. सद्यस्थितीत काम करणे अशक्य आहे. कालव्याशेजारी असणाऱ्या मोठ्या झाडांमुळेच कालव्याची दुरवस्था झाली असल्याने याबाबत वनविभागाला कळविले आहे.- एन.एन. कांबळे, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, भंडारा

टॅग्स :environmentपर्यावरण