शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लूट, नव्या दरानेच खतविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

खरिपाच्या तोंडावर खताचे भाव वाढल्याने विविध राजकीय पक्षांनी या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. खत दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट ...

खरिपाच्या तोंडावर खताचे भाव वाढल्याने विविध राजकीय पक्षांनी या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. खत दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना डीएपी खत प्रतिपिशवीच्या खरेदीवर मिळणारे पाचशे रुपयांचे अनुदान वाढवून ते १२०० रुपये करण्यात आले आहे. जुन्याच किमतीत शेतकऱ्यांना खते मिळावी यासाठी खतांचे अनुदान केंद्र सरकारने वाढविले आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक कृषी केंद्रांमध्ये नवीन दरानेच खत विक्री सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. खतांचे दर हे वेगवेगळे आहेत. डीएपीची एक बॅग साधारणत: दीड हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. लाखांदूर तालुक्यात मात्र अनेक कृषी केंद्रधारक हे आमच्याकडे जुना साठा शिल्लक नसल्याचे कारण सांगतात. खरीप हंगामात जिल्ह्यात लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर एवढे आहे. कृषी विभागातर्फे खरिपाची जोमात तयारी सुरू आहे. खताचे साठे होऊ नयेत, तसेच शेतकऱ्यांची लूट टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेतकरी मशागतीची कामे करून बियाणे व खत खरेदीसाठी कृषी केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र, अजून खताच्या किमती कमी होतील आणि आपल्याला कमी दराने खत मिळेल ही शेतकऱ्यांची आशा मात्र फोल ठरताना दिसून येत आहे.

बॉक्स

जादा किमतीने होतेय खतांची विक्री

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक कृषी विक्रेत्यांकडून मूळ किंमत कमी असतानाही १०.२६.२६ या खतासाठी बाराशे पन्नास रुपये, तसेच डीएपी खतासाठी चौदाशे ते पंधराशे रुपये आकारण्यात येत आहेत. यासोबतच अनेक कृषी विक्रेते हे शेतकऱ्यांना दिशाभूल करून समोर भाव वाढतील असेही सांगत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने अशा कृषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून परवाने निलंबित करण्याची गरज आहे. अनेकजण खताचा साठा संपला आहे असे सांगतात, तर वाढीव दराने खत खरेदी करतो सांगितल्यास तत्काळ उपलब्ध करून देतात.

बॉक्स

शेणखताच्या मागणीत वाढ

रासायनिक खतांचे वाढलेले भाव वाढले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेणखताला पहिली पसंती दिली असून, शेतकऱ्यांनी शेण खत वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, गांडूळ खते, जैविक खते वापरण्यावर भर दिला जात आहे. शेणखतापासून तयार झालेले खत जमिनीच्या सुपीकतेसाठी फायदेशीर ठरत असून, जमिनीचा पोत सुधारण्यास महत्त्वाचा ठरत आहे.

कोट -

केंद्र सरकारने खरिपाच्या तोंडावर भाववाढ केली होती. मात्र, आता खतांच्या अनुदानात वाढ केली असून, शेतकऱ्यांना जुन्या किमतींतच खत देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कृषी विक्रेते मात्र जादाचे दर आकारत आहेत.

शेतकरी

सरकारने खतांचे अनुदान वाढविले असले तरी भविष्यात दरवाढ होते की काय याची चिंता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. खत द्यायचे झाल्यास त्यासोबत इतर वस्तू घ्या हा प्रकारही अनेक कृषी केंद्रामध्ये चालतो, हा प्रकार थांबला पाहिजे.

शेतकरी