शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

जनधनच्या खात्यातून ग्राहकांची लूट

By admin | Updated: April 12, 2016 00:39 IST

जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती बँकाद्वारे ग्राहकावर करीत आहेत.

योजनेला हरताळ : खात्यात हजार रुपये शिल्लक ठेवण्याची बँकांकडून सक्तीराहुल भुतांगे  तुमसर जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती बँकाद्वारे ग्राहकावर करीत आहेत. तसे न केल्यास थेट त्यांच्या खात्यातून दंडाची रक्कम कापल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जनधन योजनेलाच बँकांकडून हरताळ फासला जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची आर्थिक लुट होत आहे.समाजातील वंचित घटकातील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना आणली. या योजनेंतर्गत झिरो बॅलन्सद्वारे नागरिकांचे बँकांमध्ये खाते उघडण्यात आले. मात्र हेच खाते आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कारण सरकारी बँकाच्या नियमानुसार या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती केली जात आहे. तसेच जे कोणी नागरिक या नियमांचे पालन करणार नाही त्याच्या खात्यातून दंडाच्या नावाखाली सबसिडीची रक्कम हडप केली जात आहे. परिणामी नागरिकांची परिस्थिती बँकेत खाते असूनही इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या गॅससह विविध प्रकारच्या सबसीडी सरकार थेट बँक खात्यावर जमा करीत आहेत. मात्र खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवल्या जात नसल्याच्या नावाखाली सबसिडीची रक्कम दंड म्हणून बँका परस्पर वळत्या करीत आहेत. मुळातच जनधन योजनेच्या खात्याचा मुळ हेतू हा झिरो बॅलन्स आहे. खात्यातील बॅलन्सबाबत कोणावरही सक्ती केली जावू नये असे आदेश सरकारने बँकांना दिले आहेत. परंतु बँकांनी या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याने ग्राहकांच्या हक्काच्या सबसीडीच्या रकमेवर पाणी सोडावे लागत आहे. जनधन योजनेत उघडण्यात आलेली खाती ही मुळातच वंचित घटकातील नागरिकांची आहेत. रोहयोवर कामे करणाऱ्यांची आहेत. त्यामुळे आधीच विविध कारणांनी पिचलेल्या या नागरिकांना बँकाकडून अरेरावीची भाषा वापरली जात आहे. त्यामुळेही हे नागरिक बँकामध्ये जाण्यास घाबरत आहेत. त्याचाच गैरफायदा बँका व्याज, खात्यावरील देवघेवीची प्रक्रिया शुल्क म्हणून कापून घेत आहेत. एकीकडे नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावतानाच त्यांना समाजाच्या बरोबर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य बँकाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बँका नियमावर बोट ठेवून सरकारसह नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या नागरिकांना सरकार न्याय देणार काय, असा प्रश्न आहे.