शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जनधनच्या खात्यातून ग्राहकांची लूट

By admin | Updated: April 12, 2016 00:39 IST

जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती बँकाद्वारे ग्राहकावर करीत आहेत.

योजनेला हरताळ : खात्यात हजार रुपये शिल्लक ठेवण्याची बँकांकडून सक्तीराहुल भुतांगे  तुमसर जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती बँकाद्वारे ग्राहकावर करीत आहेत. तसे न केल्यास थेट त्यांच्या खात्यातून दंडाची रक्कम कापल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जनधन योजनेलाच बँकांकडून हरताळ फासला जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची आर्थिक लुट होत आहे.समाजातील वंचित घटकातील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना आणली. या योजनेंतर्गत झिरो बॅलन्सद्वारे नागरिकांचे बँकांमध्ये खाते उघडण्यात आले. मात्र हेच खाते आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कारण सरकारी बँकाच्या नियमानुसार या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती केली जात आहे. तसेच जे कोणी नागरिक या नियमांचे पालन करणार नाही त्याच्या खात्यातून दंडाच्या नावाखाली सबसिडीची रक्कम हडप केली जात आहे. परिणामी नागरिकांची परिस्थिती बँकेत खाते असूनही इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या गॅससह विविध प्रकारच्या सबसीडी सरकार थेट बँक खात्यावर जमा करीत आहेत. मात्र खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवल्या जात नसल्याच्या नावाखाली सबसिडीची रक्कम दंड म्हणून बँका परस्पर वळत्या करीत आहेत. मुळातच जनधन योजनेच्या खात्याचा मुळ हेतू हा झिरो बॅलन्स आहे. खात्यातील बॅलन्सबाबत कोणावरही सक्ती केली जावू नये असे आदेश सरकारने बँकांना दिले आहेत. परंतु बँकांनी या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याने ग्राहकांच्या हक्काच्या सबसीडीच्या रकमेवर पाणी सोडावे लागत आहे. जनधन योजनेत उघडण्यात आलेली खाती ही मुळातच वंचित घटकातील नागरिकांची आहेत. रोहयोवर कामे करणाऱ्यांची आहेत. त्यामुळे आधीच विविध कारणांनी पिचलेल्या या नागरिकांना बँकाकडून अरेरावीची भाषा वापरली जात आहे. त्यामुळेही हे नागरिक बँकामध्ये जाण्यास घाबरत आहेत. त्याचाच गैरफायदा बँका व्याज, खात्यावरील देवघेवीची प्रक्रिया शुल्क म्हणून कापून घेत आहेत. एकीकडे नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावतानाच त्यांना समाजाच्या बरोबर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य बँकाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बँका नियमावर बोट ठेवून सरकारसह नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या नागरिकांना सरकार न्याय देणार काय, असा प्रश्न आहे.