शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019; मतदानाचा हक्क प्रत्येकांनी बजवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:56 IST

मतदान आपला अधिकार तर आहेच त्याही पेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले. मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देपार्थसारथी मिश्रा : भंडारा येथे मतदार जनजागृती रॅली, पथनाट्यातून मतदानाचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मतदान आपला अधिकार तर आहेच त्याही पेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी जिल्हा परिषद भंडारा येथून शालेय विद्यार्थ्यांची मतदार जागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीस मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. रॅलीत सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, मंजुषा ठवकर, स्वीपच्या नोडल अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पाच्छापूरे उपस्थित होते.लोकसभा निवडणूकीसाठी अधिकाधिकांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात मोठया प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. मंगळवारला छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून पथनाट्यातून बालमनावर मतदानाचे संस्कार करुन त्याद्वारे त्यांच्या पालकांस व परिसरातील नागरिकास मतदान करण्याचा संदेश दिला. यावेळी तुमची सुविधा आमची जबाबदारी या घोष वाक्याद्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली.रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात असर फाऊंडेशन भंडारा यांनी पथनाट्य सादर करुन मतदानाचे महत्व, संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे घडणारे भविष्य, पोस्टकार्ड, मतदारातील मतदानविषयी अज्ञान याबाबीवर प्रकाश टाकून बालमनावर संस्कार केले.मुलामुलींना आपल्या आई-वडिल व परिसरातील नागरिकांस जाऊन याविषयी महत्व व नक्की मतदान करा,असे पटवून देण्याविषयी आवाहन करण्यात आले.भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात शिक्षकांनी घरोघरी जावून मतदानासाठी मतदारास प्रोत्साहित करावे. त्यामुळे निश्चितच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल, असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. मतदान जागृती रॅली जिल्हा परिषद, राजीव गांधी चौक, मिस्किन टॅक, मुस्लीम लॉयब्ररी चौक, बस स्थानक, त्रीमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे रॅलीची सांगता झाली.संचालन मुकूंद ठवकर यांनी केले. आभार अभियान शिक्षणाधिकारी काटोलकर यांनी मानले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019