शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019; कोरंभीदेवी येथे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:06 IST

तालुक्यातील कोरंभी देवी येथे गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानासाठी मतदार रांगा लावून असल्याचे चित्र दिसून आले. संथगतीने मतदान प्रक्रिया होत असल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील कोरंभी देवी येथे गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानासाठी मतदार रांगा लावून असल्याचे चित्र दिसून आले. संथगतीने मतदान प्रक्रिया होत असल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.कोरंभी येथे मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसत होती. मात्र मतदान केंद्रात एकच मशीन आणि मतदान प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होत असल्याने नागरिक तासंतास रांगेत दिसत होते. सायंकाळी मतदानाची वेळ संपली. त्यावेळी सुमारे ३०० ते ३५० मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत होते. या सर्वांना टोकन देण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. या रांगेत मोठ्या प्रमाणात महिलाही होत्या. परंतु रात्र होत असल्याने आणि घरी मुले वाट पाहत असल्याने महिला मतदान न करताच निघून गेल्याची माहिती आहे.कोरंभी देवी येथे पूर्वी झालेल्या निवडणुकीत दोन बुथ होते. परंतु यंदा एकच बुथ तयार करण्यात आले. गावाची लोकसंख्या बघता येथे दोन बुथची आवश्यकता होती परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी उशिरा रात्रीपर्यंत मतदार रांगेत होते. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्ह्यातील बहुमांश मतदान केंद्रावर संथगतीने मतदान झाल्याच्या तक्रारी आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाची गतीही संथ दिसली. मतदानाची टक्केवारी तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मिळत होती. या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019