शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019; आता मूक प्रचारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 01:03 IST

निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे.

ठळक मुद्देखेळ मनी पॉवरचा : व्होटर स्लिप वाटपाचे कार्यही जोमात

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे.एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास करून पेपरच्या एक दिवस आधी याप्रमाणे रिव्हिजन केली जाते. तशीच रिव्हीजन लोकसभेतील १४ उमेदवारांना प्रचार यंत्रणेतील सुटलेल्या भागांची करावी लागणार आहे.जाहीर प्रचाराकरिता कायदेशीरदृष्ट्या बंद असल्याने कुठलाही गाजावाजा न करता थेट शेवटची बोलणी विविध बैठकांमधून केली जाते. आता भूमिका मांडण्याऐवजी हो की नाही ते बोला, काय हवे ते सांगा, अशा शब्दात उमेदवारांकडून मन वळविण्याचा प्रयत्न करणे सुरु झाले आहे.निवडणूक जिंकण्यासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. जाहीर प्रचारानंतरच्या मूक प्रचारालाही निवडणुकीमध्ये विशेष महत्त्व आहे. अनेक वेळा शेवटच्या दोन दिवसातच निवडणुकीचे चित्र पालटल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: या दोन दिवसामध्ये अफवांचे पेव फुटण्याची भीती मोठ्या प्रमाणात राहते.या माध्यमातूनच अनेकांकडून स्वत:साठी अनुकूल असे राजकीय वातावरण तयार केले जाते. विशेषत: एखाद्या समाजाशी किंवा जातीशी जुळलेली गठ्ठा मते मिळविण्यासाठी या दिवसांमध्ये नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. मतदार याद्या पाठविणे, बुथ लावणे याचेही नियोजन उमेदवारांकडून केले जाते. या नियोजनावरच विजयाचे गणित बऱ्याचअंशी अवलंबून असते. जिवाचे रान करून जाहीर प्रचार केल्यानंतर त्याचे चीज करून घेण्याची शेवटची संधी म्हणजे मूक प्रचारासाठी मिळालेला दोन दिवसांचा कालावधी होय.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया