शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तिमत्व विकासाची संधी

By admin | Updated: September 11, 2015 01:04 IST

मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन : राजपूत यांचे प्रतिपादन भंडारा : मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे. त्या अक्षराचे मानवी व देशाच्या विकास प्रक्रियेला चालना देते. साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तीमत्व विकासाची संधी आहे, असे प्रतिपादन प्रा.एन.राजपूत यांनी केले. प्रगती महिला महाविद्यालय भंडारा येथे निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. राजपूत, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. ए.बी. चवरे यांच्या उपस्थितीत पार पडला.प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे म्हणाले, आज मानवाला जल साक्षरतेची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे. आज पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न तयार झाला आहे. म्हणून पाण्याचा वापर, पाण्याची उपयोगिता लक्षात घेवून त्याचा योग्यरित्या उपयोग केला पाहिजे. तसेच आधुनिक काळ हे तांत्रिकज्ञान, संगणकाचे युग आहे. याकरिता व्यक्तीने अशा साधनाच्या बाबतीत साक्षर होणे आज काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.बी. चवरे यांनी केले. संचालन अर्चना डोरले व आभार जयश्री समरीत हिने मानले. कार्यक्रमासाठी प्रा. विजया लिमसे, प्रा. क्रिष्णा पासवान, प्रा. कल्पना निंबार्ते, प्रा. एस.एस. राठोड, प्रा. जी.एन. कळंबे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)