शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तिमत्व विकासाची संधी

By admin | Updated: September 11, 2015 01:04 IST

मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन : राजपूत यांचे प्रतिपादन भंडारा : मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे. त्या अक्षराचे मानवी व देशाच्या विकास प्रक्रियेला चालना देते. साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तीमत्व विकासाची संधी आहे, असे प्रतिपादन प्रा.एन.राजपूत यांनी केले. प्रगती महिला महाविद्यालय भंडारा येथे निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. राजपूत, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. ए.बी. चवरे यांच्या उपस्थितीत पार पडला.प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे म्हणाले, आज मानवाला जल साक्षरतेची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे. आज पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न तयार झाला आहे. म्हणून पाण्याचा वापर, पाण्याची उपयोगिता लक्षात घेवून त्याचा योग्यरित्या उपयोग केला पाहिजे. तसेच आधुनिक काळ हे तांत्रिकज्ञान, संगणकाचे युग आहे. याकरिता व्यक्तीने अशा साधनाच्या बाबतीत साक्षर होणे आज काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.बी. चवरे यांनी केले. संचालन अर्चना डोरले व आभार जयश्री समरीत हिने मानले. कार्यक्रमासाठी प्रा. विजया लिमसे, प्रा. क्रिष्णा पासवान, प्रा. कल्पना निंबार्ते, प्रा. एस.एस. राठोड, प्रा. जी.एन. कळंबे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)