शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तिमत्व विकासाची संधी

By admin | Updated: September 11, 2015 01:04 IST

मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन : राजपूत यांचे प्रतिपादन भंडारा : मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे. त्या अक्षराचे मानवी व देशाच्या विकास प्रक्रियेला चालना देते. साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तीमत्व विकासाची संधी आहे, असे प्रतिपादन प्रा.एन.राजपूत यांनी केले. प्रगती महिला महाविद्यालय भंडारा येथे निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. राजपूत, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. ए.बी. चवरे यांच्या उपस्थितीत पार पडला.प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे म्हणाले, आज मानवाला जल साक्षरतेची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे. आज पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न तयार झाला आहे. म्हणून पाण्याचा वापर, पाण्याची उपयोगिता लक्षात घेवून त्याचा योग्यरित्या उपयोग केला पाहिजे. तसेच आधुनिक काळ हे तांत्रिकज्ञान, संगणकाचे युग आहे. याकरिता व्यक्तीने अशा साधनाच्या बाबतीत साक्षर होणे आज काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.बी. चवरे यांनी केले. संचालन अर्चना डोरले व आभार जयश्री समरीत हिने मानले. कार्यक्रमासाठी प्रा. विजया लिमसे, प्रा. क्रिष्णा पासवान, प्रा. कल्पना निंबार्ते, प्रा. एस.एस. राठोड, प्रा. जी.एन. कळंबे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)