शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बंद कारखान्यातून मॅग्नीजची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:47 IST

येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅग्नीजची परप्रांतात विक्री करणे सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग तथा व्यवस्थापनाने करार करून कारखान्याला वीज बिल माफ केले होते. कारखाना सुरू करण्याच्या अटीवर कारखान्याचे वीज बिल माफ करण्यात आले.

ठळक मुद्देकराराचा भंग : अभय योजनेत वीज बिलात सुट

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅग्नीजची परप्रांतात विक्री करणे सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग तथा व्यवस्थापनाने करार करून कारखान्याला वीज बिल माफ केले होते. कारखाना सुरू करण्याच्या अटीवर कारखान्याचे वीज बिल माफ करण्यात आले. चार वर्षाचा कालावधीनंतरही कारखाना सुरू झाला नाही. उलट कारखानदार कारखान्यातील मॅग्नीज विक्री करीत आहे. कराराच्या भंग प्रकरणात राज्य शासनाने अद्याप कारवाई केली नाही, हे विशेष.तुमसरजवळ युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना आहे. या कारखान्यावर २०० कोटीपेक्षा जास्त वीज बिल थकीत आहे. मागील १३ वर्षापासून कारखाना कायम बंद आहे. आजारी कारखान्यांना उभारी देण्याकरिता राज्य शासनाने अभय योजना आणली. अभय योजनेत तुमसरच्या युनिव्हर्सल फेरो कारखान्याचा समावेश आहे. राज्य शासनाच्या उर्जा विभागाने कारखाना सुरू करण्याचा अटीवर सदर कारखान्याचे सुमारे १५० कोटी रूपये माफ केले. त्याला तीन वर्षात पुन्हा कारखाना सुरू करण्याची त्यात अट होती, परंतु कारखानदाराने कारखाना सुरू केला नाही.कारखाना परिसरात कोट्यवधीची मॅग्नीजचा साठा आहे. करार केल्यानंतर कारखानदाराने मॅग्नीज परप्रांतात विक्री करणे तात्काळ सुरू केले. आताही मॅग्नीज परप्रांतात विक्री करणे सुरूच आहे. आतापर्यंत कोट्यवधींची मॅग्नीज विक्री करण्यात आली. दररोज कारखान्यातून १२ ते १५ ट्रक मॅग्नीजची उचल केली जात आहे.करार भंग प्रकरण न्यायालयाततीन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर वीज वितरण कंपनीने संबंधित कारखाना प्रशासनाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्याची न्यायालयीन कारवाई सुरू आहे.प्रशासकीय कारवाई नाहीअभय योजनेत सदर कारखान्याला वीज बिल माफ करण्यात आले. कारखाना सुरू करण्याचा येथे भंग झाल, परंतु राज्य शासनाने करारभंग प्रकरणात प्रशासकीय कारवाई केली नाही हा संशोधनाचा विषय आहे. किमान कारखाना परिसरातून कोट्यवधी मॅग्नीजची उचल करण्यास मज्जाव करण्याची गरज होती.प्रकरणाची चौकशी करावीराज्य शासनाच्या उर्जा विभाग व कारखानदार यांच्यात अभय योजनेत करार झाला. त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. करार भंग प्रकरण गंभीर आहे. संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाईची गरज आहे.येथील कारखानदार व राज्य शासनात करार होवून वीज बिल माफ करण्यात आले. कारखाना सुरू झाला नाही. उलट मॅग्नीज विक्री करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मौल्यवान जमिनी येथे परत कराव्यात. बेरोजगारांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. शासनाचा करार कारखानदार कसा काय मोडू शकतो हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. सदर प्रकरणाबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.-डॉ. पंकज कारेमोरे, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस विदर्भ.