शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
4
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
5
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
6
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
7
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
8
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
9
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
10
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
11
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
12
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
13
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
14
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
15
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
16
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
17
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
18
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
19
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!

बंद कारखान्यातून मॅग्नीजची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:47 IST

येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅग्नीजची परप्रांतात विक्री करणे सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग तथा व्यवस्थापनाने करार करून कारखान्याला वीज बिल माफ केले होते. कारखाना सुरू करण्याच्या अटीवर कारखान्याचे वीज बिल माफ करण्यात आले.

ठळक मुद्देकराराचा भंग : अभय योजनेत वीज बिलात सुट

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅग्नीजची परप्रांतात विक्री करणे सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग तथा व्यवस्थापनाने करार करून कारखान्याला वीज बिल माफ केले होते. कारखाना सुरू करण्याच्या अटीवर कारखान्याचे वीज बिल माफ करण्यात आले. चार वर्षाचा कालावधीनंतरही कारखाना सुरू झाला नाही. उलट कारखानदार कारखान्यातील मॅग्नीज विक्री करीत आहे. कराराच्या भंग प्रकरणात राज्य शासनाने अद्याप कारवाई केली नाही, हे विशेष.तुमसरजवळ युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना आहे. या कारखान्यावर २०० कोटीपेक्षा जास्त वीज बिल थकीत आहे. मागील १३ वर्षापासून कारखाना कायम बंद आहे. आजारी कारखान्यांना उभारी देण्याकरिता राज्य शासनाने अभय योजना आणली. अभय योजनेत तुमसरच्या युनिव्हर्सल फेरो कारखान्याचा समावेश आहे. राज्य शासनाच्या उर्जा विभागाने कारखाना सुरू करण्याचा अटीवर सदर कारखान्याचे सुमारे १५० कोटी रूपये माफ केले. त्याला तीन वर्षात पुन्हा कारखाना सुरू करण्याची त्यात अट होती, परंतु कारखानदाराने कारखाना सुरू केला नाही.कारखाना परिसरात कोट्यवधीची मॅग्नीजचा साठा आहे. करार केल्यानंतर कारखानदाराने मॅग्नीज परप्रांतात विक्री करणे तात्काळ सुरू केले. आताही मॅग्नीज परप्रांतात विक्री करणे सुरूच आहे. आतापर्यंत कोट्यवधींची मॅग्नीज विक्री करण्यात आली. दररोज कारखान्यातून १२ ते १५ ट्रक मॅग्नीजची उचल केली जात आहे.करार भंग प्रकरण न्यायालयाततीन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर वीज वितरण कंपनीने संबंधित कारखाना प्रशासनाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्याची न्यायालयीन कारवाई सुरू आहे.प्रशासकीय कारवाई नाहीअभय योजनेत सदर कारखान्याला वीज बिल माफ करण्यात आले. कारखाना सुरू करण्याचा येथे भंग झाल, परंतु राज्य शासनाने करारभंग प्रकरणात प्रशासकीय कारवाई केली नाही हा संशोधनाचा विषय आहे. किमान कारखाना परिसरातून कोट्यवधी मॅग्नीजची उचल करण्यास मज्जाव करण्याची गरज होती.प्रकरणाची चौकशी करावीराज्य शासनाच्या उर्जा विभाग व कारखानदार यांच्यात अभय योजनेत करार झाला. त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. करार भंग प्रकरण गंभीर आहे. संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाईची गरज आहे.येथील कारखानदार व राज्य शासनात करार होवून वीज बिल माफ करण्यात आले. कारखाना सुरू झाला नाही. उलट मॅग्नीज विक्री करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मौल्यवान जमिनी येथे परत कराव्यात. बेरोजगारांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. शासनाचा करार कारखानदार कसा काय मोडू शकतो हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. सदर प्रकरणाबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.-डॉ. पंकज कारेमोरे, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस विदर्भ.