शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

ंनशिबावर सोडलेल्या ‘सांजवी’ला आयुष्याचे दान

By admin | Updated: November 18, 2015 00:49 IST

घरची परिस्थीती हलाखीची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध-अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदा हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरिराला अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत होता

शुभवर्तमान : राजीव गांधी जीवनदायी योजनेतून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया भंडारा : घरची परिस्थीती हलाखीची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध-अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदा हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरिराला अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत होता. त्यामुळ थोड चाललं- बोललं तरी धाप लागायची. ओठ, हातापायाची नखं काळी-निळी पडायची. खाजगी डॉक्टरांनी आॅपरेशनचा खर्च तीन लाख रुपये सांगितला. परंतु पैसे नसल्यामुळे आईवडीलांनी तिला नशीबावर सोडून दिले होते. अशातच राजीव गांधी जीवनदायी योजना ‘सांजवी’साठी वरदान ठरली. या योजनेतून सांजवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सांजवीला नव्या आयुष्याचे दान मिळाले. भंडारा तालुक्यातील पाच किलोमीटरवर असलेल्या फुलमोगरा या गावी मनोज आणि अंजली बडगे हे कुटुंब राहते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तीन भावंडामध्ये सांजवी मोठी. अडीच वर्षाची असताना तिला खुप ताप आला. त्यावेळी तिला नागपुरातील सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे सांगितले. आॅपरेशनशिवाय हा आजार बरा होऊ शकत नाही, त्यामुळे आॅपरेशन करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु बागडे कुटूंबियांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे तिचे पैशाअभावी आॅपरेशन होऊ शकले नाही. सांजवी मोठी व्हायला लागली तसा तिचा त्रास वाढत होता. १० पावलं चालली तरी तिचा श्वास भरून यायचा. ओठ, हातापायाची नखे निळी पडायची. शाळेत नाव घातले पण मध्येच शाळेतील शिक्षक तिला घरी आणून सोडायचे. तिची अभ्यासातील प्रगतीही त्यामुळे जेमतेम होती. सतत आजारी पडायची. अशाच अवस्थेत सांजवी नऊ वर्षाची झाली. आॅगस्ट २०१३ मध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सांजवीला हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सांजवीच्या आईवडिलांना तिच्या सगळया तपासणी करण्यासाठी सांगितले. इको तपासणीत तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले. डॉ. वासनिक आणि डॉ.मेश्राम यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून तिचे आॅपरेशन करून घेण्यासाठी सांजवीच्या आईवडिलांकडे पाठपुरावा केला. सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालयात आॅगस्ट २०१५ मध्ये सांजवीवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. पैशाशिवाय राजीव गांधी जीवनदायी योजनेतून सांजवीला जीवनदान मिळाले. आज ती स्वस्थ जीवन जगत आहे. आम्ही नशिबावर सोडून दिलेल्या सांजवीच्या जगण्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेने नवीन प्राण ओतला. आज सांजवी हसतखेळत शाळेत जाताना पाहुन तिच्या भविष्याची चिंता मिटली, अशी बोलकी प्रतिक्रिया सांजवीची आई अंजू बडगे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)