शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

ंनशिबावर सोडलेल्या ‘सांजवी’ला आयुष्याचे दान

By admin | Updated: November 18, 2015 00:49 IST

घरची परिस्थीती हलाखीची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध-अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदा हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरिराला अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत होता

शुभवर्तमान : राजीव गांधी जीवनदायी योजनेतून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया भंडारा : घरची परिस्थीती हलाखीची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध-अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदा हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरिराला अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत होता. त्यामुळ थोड चाललं- बोललं तरी धाप लागायची. ओठ, हातापायाची नखं काळी-निळी पडायची. खाजगी डॉक्टरांनी आॅपरेशनचा खर्च तीन लाख रुपये सांगितला. परंतु पैसे नसल्यामुळे आईवडीलांनी तिला नशीबावर सोडून दिले होते. अशातच राजीव गांधी जीवनदायी योजना ‘सांजवी’साठी वरदान ठरली. या योजनेतून सांजवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सांजवीला नव्या आयुष्याचे दान मिळाले. भंडारा तालुक्यातील पाच किलोमीटरवर असलेल्या फुलमोगरा या गावी मनोज आणि अंजली बडगे हे कुटुंब राहते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तीन भावंडामध्ये सांजवी मोठी. अडीच वर्षाची असताना तिला खुप ताप आला. त्यावेळी तिला नागपुरातील सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे सांगितले. आॅपरेशनशिवाय हा आजार बरा होऊ शकत नाही, त्यामुळे आॅपरेशन करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु बागडे कुटूंबियांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे तिचे पैशाअभावी आॅपरेशन होऊ शकले नाही. सांजवी मोठी व्हायला लागली तसा तिचा त्रास वाढत होता. १० पावलं चालली तरी तिचा श्वास भरून यायचा. ओठ, हातापायाची नखे निळी पडायची. शाळेत नाव घातले पण मध्येच शाळेतील शिक्षक तिला घरी आणून सोडायचे. तिची अभ्यासातील प्रगतीही त्यामुळे जेमतेम होती. सतत आजारी पडायची. अशाच अवस्थेत सांजवी नऊ वर्षाची झाली. आॅगस्ट २०१३ मध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सांजवीला हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सांजवीच्या आईवडिलांना तिच्या सगळया तपासणी करण्यासाठी सांगितले. इको तपासणीत तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले. डॉ. वासनिक आणि डॉ.मेश्राम यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून तिचे आॅपरेशन करून घेण्यासाठी सांजवीच्या आईवडिलांकडे पाठपुरावा केला. सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालयात आॅगस्ट २०१५ मध्ये सांजवीवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. पैशाशिवाय राजीव गांधी जीवनदायी योजनेतून सांजवीला जीवनदान मिळाले. आज ती स्वस्थ जीवन जगत आहे. आम्ही नशिबावर सोडून दिलेल्या सांजवीच्या जगण्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेने नवीन प्राण ओतला. आज सांजवी हसतखेळत शाळेत जाताना पाहुन तिच्या भविष्याची चिंता मिटली, अशी बोलकी प्रतिक्रिया सांजवीची आई अंजू बडगे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)