शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मशरुम शेतीतून प्रकल्पग्रस्तांची ‘जीवनोन्नती’

By admin | Updated: July 1, 2014 01:20 IST

पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला गेला. या पार्श्वभुमीवर त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार ‘जिवनोन्नती

भंडारा : पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला गेला. या पार्श्वभुमीवर त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार ‘जिवनोन्नती उपक्र म’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मशरुम (अळींबी) लागवड करण्यात येत असून प्रकल्पबाधितांचे आर्थिक स्थैर्य मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.गोसेखुर्द प्रकल्प हा राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्पप आहे. या प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. त्यांच्या हातचा रोजगार सुटला. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम देण्यात यावा, अशी मागणी शासनदरबारी अनेकदा करण्यात आली. आता या मागणीचा विचार करून नागपूर विभागीय आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ग्रामीण विकास यंत्रणेला निर्देश दिले. सदर प्रकल्पग्रस्तांसाठी जिवनोन्नती उपक्र मांतर्गत मशरूम (अळींबी) संवर्धन प्रकल्प राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.त्यानुसार जिल्हा प्रशासनाने भंडारा व पवनी तालुक्यातील सात गावांची निवड केली. यामध्ये भंडारा तालुक्यातील टाकळी, सिरसघाट, मकरधोकडा, बोरगाव तसेच पवनी तालुक्यातील मालची, सौंदड व पाथरी या गावांची निवड केली. सुरुवातीला ग्रामीण विकास यंत्रणा, आत्मा व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावात जावून गावकऱ्यांच्या सभा घेतल्या. त्यांना उपक्रमाची माहिती दिली. गावकऱ्यांनी हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगिल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले.निवड करण्यात आलेल्या गावातील प्रशिक्षणार्थ्यांची संख्या २१० आहे. या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये महिलांचा सहभाग उत्स्फुर्त आहे. या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून आता प्रत्यक्ष मशरूम उत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ दिवसानंतर मशरूमचे उत्पादन हाती येणार आहे. बाजारात ओल्या मशरूमला दीडशे ते दोनशे रूपये प्रति किलो तर वाळल्या मशरुमला ७०० ते ८०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो.यासाठी लागणारा लागवड खर्च २०० ते ३०० रुपये असल्याने ही शेती प्रकल्पग्रस्तांसाठी पर्वणी ठरणारी आहे. मशरूमचा वापर खाण्यासाठी, औषधी तयार करण्यासाठी होत असल्यामुळे त्याला मोठी मागणी आहे.