शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

ध्वनी प्रदूषणामुळे जीवसृष्टीचे चक्र विस्कळीत

By admin | Updated: October 28, 2015 00:38 IST

अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे.

पक्ष्यांचा संवाद तुटतोय : अन्नच मिळत नसल्याने अकाली मृत्यू, कर्कश आवाजांचाही धोकाभंडारा : अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची सादच हरविली आहे. याचे मुख्य कारण दिवसेंदिवस वाढत चाललेले ध्वनी प्रदूषण आहे. पक्षांचा आपसातील ध्वनीही संपुष्टात आला आहे. त्याची तीव्रता इतकी की नुकत्याच जन्मलेल्या व भूकेने व्याकूळ झालेल्या पिलांचाही आवाज आईपर्यंत पोहोचत नाही. पूर्वी पक्षी आपल्या पिलांना जसा आदेश द्यायचे, त्या आदेशाचे पालन इवलेसे जीव करीत होते. पण पक्ष्यांचा आवाज आता त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या पक्ष्यांचे आयुष्यच धोक्यात आले आहे. जसे एखादे बाळ खाण्यापिण्यासाठी, संरक्षणासाठी अवलंबून असते. पक्ष्यांची पिलंही पक्ष्यांवर अवलंबून असतात. आपल्या पिलांवर संकट आले असे लक्षात येताच पक्षी लगेचच आपल्या विशिष्ट आवाजात पिलांना सावध करतात. मात्र आता वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न आणि मानवनिर्मित इतर ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांचा आवाज पिलापर्यंत पोहोचत नाही. रहदारी, इमारतीचे बांधकाम किंवा इतर गोंगाटामुळे पिले आपल्या आईचा म्हणजेच पक्ष्यांचा आवाज ऐकू शकत नाही. त्यामुळे त्यांचा संवाद तुटतो आहे. हा संवाद तुटल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचत आहे. त्याचबरोबर अन्न, पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्याची संख्या कमी होण्याचे हेही कारण आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)