शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

गोसेच्या डाव्या कालव्यालगतचे धान पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:54 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न .......

ठळक मुद्देशेतकºयांचा अधिकाºयांना घेराव : नुकसानभरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी/चिचाळ/आसगाव : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न पाहणाºया शेतकºयांच्या डोळ्यात प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या निर्मितीने वाहणाºया सांडपाण्याची सुलतानी अधिकाºयांनी योग्य नियोजन न केल्याने सेंद्री खु. सेंद्री बु. कोंढा व खैरी दिवाण येथील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली असून धान सडण्याच्या मार्गावर आहेत.इंदिरा सागर गोसे प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा सेंद्री खुर्द, सेंद्री बु., कोंढा व खैरी दि. शेत शिवारातून गेला आहे. मात्र सदर शेत शिवारातून वाहणारे ओढे व पाणी वाहून नेणारे प्रवाह डाव्या कालव्याच्या योग्य नियोजन करण्यात नाही आल्याने सदर परिसरात ८ ते १० दिवस पाणी शेतात साचून राहतो. तर कालव्याच्या कडेने पाणी वाहून नेणारी कॅलन व सदर परिसरात कालव्याचे शाखा कालवा उपशाखा कालवा वितरिका उपवितरिका असे अनेक जाळे पसरले आहेत. मात्र शेत शिवारातील वाहुन जाणारे पाण्याची नियोजन न केल्याने हे पाणी साचून राहत आहे.गेल्या एक महिन्यापुर्वी सदर परिसरातील शेतकºयांनी व आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी लेखी तोंडी सांगूनही शासनाने कानाडोळा केल्याने आता नुकत्याच येवून गेलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शेतातील कोवळी रोवळी, पºहे पाच दिवसापासून पाण्याखाली आली आहे.आज ११ आॅगस्टला सकाळपासूनच आझाद शेतकरी संघत्तचे अध्यक्ष किशोर पंचभाई व शेतकरी संबंधित अधिकाºयांची चेतकाप्रमाणे वाट पाहत होती काही वेळाने अधिकारी येताच त्यांना घेराव टाकून हे तुमच्या नियोजनाअभावी पाणी वाहणाचा प्रवाह बंद झाला त्यांची योग्य विल्हेवाट लावा व झालेली नुकसान भरपाई द्या अभियंता वाघमारे यांनी मेकॅनिकलची मशीन शासनाकडे उपलब्ध नसून तुम्ही भाड्याने मशीन आणा आम्ही त्याचा मोबदला देवू मात्र शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते तुम्ही वरिष्ठांना मौक्यावर बोलवा तरच यांचा विल्हेवाट लागेल ही भूमिका शेतकºयांनी बातमी लिहीपर्यंत घेतली होती.यावेळी अंकोश गिरडकर, लक्ष्मण दिघोरे, सदाशिव सावरकर, शरद मोहरकर, बंडू गिरडकर, राजीराम गायधने, चंद्रलाल गायधने, अशोक नागरीकर, दिलीप नागरीकर, निलकंठ सेलोकर, दशरत वाडीभस्मे, उमेश पंचभाई, जागेश्वर वाडीभस्मे, राजु पंचभाई, जयदेव भुरे, मुरलीधर धाबेकर व सेंद्री, कोंढा, खैरी येथील शेतकरी व आझाद शेतकरी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासनाच्या वेळकाढू धोरणाने शेतकºयांवर गेल्या कित्येक वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होत आहे. सदर परिसराची चौकशी करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल.-किशोर पंचभाई, अध्यक्ष, आझाद शेतकरी संघ.