शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
4
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
5
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
6
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
7
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
8
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
11
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
12
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
13
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
14
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
15
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
16
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
17
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
18
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
19
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
20
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताचे खड्डे बनले रोगराईचे माहेरघर

By admin | Updated: September 10, 2014 23:26 IST

ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या

बारव्हा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या एका बाजुला असायची व त्यासाठी राखीव शासकीय जागा राहत होती. मात्र सरकारी जागेवर बांधकामे झाल्यामुळे शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर त्याचप्रमाणे काही गावामध्ये घराशेजारी दिसून येतात. परिणामी या शेणखताच्या ढिगाऱ्यांमुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागात स्वच्दता राहावी व त्यापासून कोणताही आजार होऊ नये म्हणून जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी प्रत्येक पंचायत समितीतील गावामध्ये असणारे शेणखताचे ढिगारे त्वरीत गावाबाहेर काढावे. याबाबतचे आदेश दिले होते. त्या आदेशाची पंचायत समिती कार्यालयाने दखल घेवून ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत दखल घ्यावी याबाबत लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र कोणत्याही ग्रामपंचायतने आदेशाचे पालन न करता चक्क त्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली असल्याचे समजते. तथापि शेखणखताचे खड्डे रोगराईचे माहेरघर असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील जनतेसाठी राहणीमान सुंदर व स्वच्छ राहण्याकरिता राबविले जातात. मात्र त्यात अपयश आल्याचे चित्र लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, पारडी, मुरमाडी, मानेगाव येथे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना असल्या तरी गावकऱ्यांच्या असहकार्यामुळे त्या निष्फळ ठरल्या आहेत. ग्रामस्थांनी शेणखताचे ढिगारे मुख्य रस्त्यावर टाकले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यापासून जलजन्य आणि किटकजन्य आजार पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबद स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)