शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

शेणखताचे खड्डे बनले रोगराईचे माहेरघर

By admin | Updated: September 10, 2014 23:26 IST

ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या

बारव्हा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या एका बाजुला असायची व त्यासाठी राखीव शासकीय जागा राहत होती. मात्र सरकारी जागेवर बांधकामे झाल्यामुळे शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर त्याचप्रमाणे काही गावामध्ये घराशेजारी दिसून येतात. परिणामी या शेणखताच्या ढिगाऱ्यांमुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागात स्वच्दता राहावी व त्यापासून कोणताही आजार होऊ नये म्हणून जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी प्रत्येक पंचायत समितीतील गावामध्ये असणारे शेणखताचे ढिगारे त्वरीत गावाबाहेर काढावे. याबाबतचे आदेश दिले होते. त्या आदेशाची पंचायत समिती कार्यालयाने दखल घेवून ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत दखल घ्यावी याबाबत लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र कोणत्याही ग्रामपंचायतने आदेशाचे पालन न करता चक्क त्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली असल्याचे समजते. तथापि शेखणखताचे खड्डे रोगराईचे माहेरघर असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील जनतेसाठी राहणीमान सुंदर व स्वच्छ राहण्याकरिता राबविले जातात. मात्र त्यात अपयश आल्याचे चित्र लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, पारडी, मुरमाडी, मानेगाव येथे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना असल्या तरी गावकऱ्यांच्या असहकार्यामुळे त्या निष्फळ ठरल्या आहेत. ग्रामस्थांनी शेणखताचे ढिगारे मुख्य रस्त्यावर टाकले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यापासून जलजन्य आणि किटकजन्य आजार पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबद स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)