शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
3
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
4
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
5
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
6
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
7
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
8
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
9
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
10
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
11
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
12
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
13
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
14
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
15
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
16
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
17
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
18
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
19
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
20
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)

पाणी साठवण क्षमता असलेला लाखांदूर तालुका कोरडा

By admin | Updated: February 29, 2016 00:18 IST

तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला.

निधी खर्च : उन्हाळ्यात निर्माण होईल पाण्याची टंचाईलाखांदूर : तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठवण क्षमता असलेले सर्व साधनात आज थेंब पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना भिषण पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.पाणी अडवा, पाणी जिरवा हे म्हणणे सोपे आहे. जितकेच प्रशासनाचा अधिकाऱ्यांना व यंत्रणेनी पाण्याची तीव्र टंचाई भासवून अपयश पदरी पाडले आहे. तालुक्यातील सर्वच यंत्रणेचा माध्यमातून शेततळे सिमेंट नाला बांधकाम, बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. वनविभागाच्यावतीने मागील तीन वर्षापासून लाखो रुपयाची वनतलाव, बंधारे बांधण्यात झाली. पाणी अडवून गिरविणे हा मुख्य उद्योग असला तरी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, मात्र लाखो रुपये खर्च करूनही उन्हाळ्यात तर थेंब न थेंब पाण्याचा ठणठणाट असतोच. पावसाळ्यात पाणी अडविल्या जात नाही. त्यामुळे हे वनतलाव निरर्थक ठरले आहेत. तालुका कृषी कार्यालयामार्फत मागणीनुसार शेतकऱ्यांना शेती व्यवसायाला सिंचनाचा आधार व्हावा म्हणून शेततळे बांधण्यात आले. नाही तर अर्धवट बांधकाम झालेल्या शेततळ्यांची संख्या जास्त दिसून येते. याकरिता सुद्धा शासनाचा लाखोचा निधी खर्च करण्यात आला. तर अनेक शेतकऱ्यांना खर्च केलेली रक्कम अर्धवट बांधकामामुळे अडून आहे. सद्यस्थितीत बहुतांश शेततळे कोरडे आहेत. त्यामुळे पाण्याची पानही वाढणे गरजेचे असतानी या अनेक कारणामुळे खोलवर गेलेली आहे. निधी खर्च मात्र शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट म्हटल्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरला नाही.जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विक्रमी सिमेंट नाला बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला. ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी आहे. पाणी अडवून त्या पाण्याचा वापर सिंचनाकरिता व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश फोल ठरला आहे. निकृष्ट बांधकामामुळे पाणी अडवता आले नाही. बंधाऱ्यांना भगदाड असल्याने पाणी सरळ वाहून गेले. अन् बांधारे कोरडे राहिले. चालू वर्षातील संपूर्ण बंधारे, वनतलाव, शेततळ्यांची चौकशी केल्यास कोट्यावधीची निधी, पाणी साठवण साधनासाठी व्यर्थ गेल्याचा निष्कर्ष घरी लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे यंदा पाण्याची तीव्र टंचाई नक्कीच जाणवणार असून आतापासून तालुक्यातील अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहे. (तालुका प्रतिनिधी)