शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणी साठवण क्षमता असलेला लाखांदूर तालुका कोरडा

By admin | Updated: February 29, 2016 00:18 IST

तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला.

निधी खर्च : उन्हाळ्यात निर्माण होईल पाण्याची टंचाईलाखांदूर : तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठवण क्षमता असलेले सर्व साधनात आज थेंब पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना भिषण पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.पाणी अडवा, पाणी जिरवा हे म्हणणे सोपे आहे. जितकेच प्रशासनाचा अधिकाऱ्यांना व यंत्रणेनी पाण्याची तीव्र टंचाई भासवून अपयश पदरी पाडले आहे. तालुक्यातील सर्वच यंत्रणेचा माध्यमातून शेततळे सिमेंट नाला बांधकाम, बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. वनविभागाच्यावतीने मागील तीन वर्षापासून लाखो रुपयाची वनतलाव, बंधारे बांधण्यात झाली. पाणी अडवून गिरविणे हा मुख्य उद्योग असला तरी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, मात्र लाखो रुपये खर्च करूनही उन्हाळ्यात तर थेंब न थेंब पाण्याचा ठणठणाट असतोच. पावसाळ्यात पाणी अडविल्या जात नाही. त्यामुळे हे वनतलाव निरर्थक ठरले आहेत. तालुका कृषी कार्यालयामार्फत मागणीनुसार शेतकऱ्यांना शेती व्यवसायाला सिंचनाचा आधार व्हावा म्हणून शेततळे बांधण्यात आले. नाही तर अर्धवट बांधकाम झालेल्या शेततळ्यांची संख्या जास्त दिसून येते. याकरिता सुद्धा शासनाचा लाखोचा निधी खर्च करण्यात आला. तर अनेक शेतकऱ्यांना खर्च केलेली रक्कम अर्धवट बांधकामामुळे अडून आहे. सद्यस्थितीत बहुतांश शेततळे कोरडे आहेत. त्यामुळे पाण्याची पानही वाढणे गरजेचे असतानी या अनेक कारणामुळे खोलवर गेलेली आहे. निधी खर्च मात्र शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट म्हटल्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरला नाही.जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विक्रमी सिमेंट नाला बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला. ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी आहे. पाणी अडवून त्या पाण्याचा वापर सिंचनाकरिता व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश फोल ठरला आहे. निकृष्ट बांधकामामुळे पाणी अडवता आले नाही. बंधाऱ्यांना भगदाड असल्याने पाणी सरळ वाहून गेले. अन् बांधारे कोरडे राहिले. चालू वर्षातील संपूर्ण बंधारे, वनतलाव, शेततळ्यांची चौकशी केल्यास कोट्यावधीची निधी, पाणी साठवण साधनासाठी व्यर्थ गेल्याचा निष्कर्ष घरी लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे यंदा पाण्याची तीव्र टंचाई नक्कीच जाणवणार असून आतापासून तालुक्यातील अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहे. (तालुका प्रतिनिधी)