शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साठवण क्षमता असलेला लाखांदूर तालुका कोरडा

By admin | Updated: February 29, 2016 00:18 IST

तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला.

निधी खर्च : उन्हाळ्यात निर्माण होईल पाण्याची टंचाईलाखांदूर : तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठवण क्षमता असलेले सर्व साधनात आज थेंब पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना भिषण पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.पाणी अडवा, पाणी जिरवा हे म्हणणे सोपे आहे. जितकेच प्रशासनाचा अधिकाऱ्यांना व यंत्रणेनी पाण्याची तीव्र टंचाई भासवून अपयश पदरी पाडले आहे. तालुक्यातील सर्वच यंत्रणेचा माध्यमातून शेततळे सिमेंट नाला बांधकाम, बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. वनविभागाच्यावतीने मागील तीन वर्षापासून लाखो रुपयाची वनतलाव, बंधारे बांधण्यात झाली. पाणी अडवून गिरविणे हा मुख्य उद्योग असला तरी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, मात्र लाखो रुपये खर्च करूनही उन्हाळ्यात तर थेंब न थेंब पाण्याचा ठणठणाट असतोच. पावसाळ्यात पाणी अडविल्या जात नाही. त्यामुळे हे वनतलाव निरर्थक ठरले आहेत. तालुका कृषी कार्यालयामार्फत मागणीनुसार शेतकऱ्यांना शेती व्यवसायाला सिंचनाचा आधार व्हावा म्हणून शेततळे बांधण्यात आले. नाही तर अर्धवट बांधकाम झालेल्या शेततळ्यांची संख्या जास्त दिसून येते. याकरिता सुद्धा शासनाचा लाखोचा निधी खर्च करण्यात आला. तर अनेक शेतकऱ्यांना खर्च केलेली रक्कम अर्धवट बांधकामामुळे अडून आहे. सद्यस्थितीत बहुतांश शेततळे कोरडे आहेत. त्यामुळे पाण्याची पानही वाढणे गरजेचे असतानी या अनेक कारणामुळे खोलवर गेलेली आहे. निधी खर्च मात्र शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट म्हटल्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरला नाही.जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विक्रमी सिमेंट नाला बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला. ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी आहे. पाणी अडवून त्या पाण्याचा वापर सिंचनाकरिता व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश फोल ठरला आहे. निकृष्ट बांधकामामुळे पाणी अडवता आले नाही. बंधाऱ्यांना भगदाड असल्याने पाणी सरळ वाहून गेले. अन् बांधारे कोरडे राहिले. चालू वर्षातील संपूर्ण बंधारे, वनतलाव, शेततळ्यांची चौकशी केल्यास कोट्यावधीची निधी, पाणी साठवण साधनासाठी व्यर्थ गेल्याचा निष्कर्ष घरी लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे यंदा पाण्याची तीव्र टंचाई नक्कीच जाणवणार असून आतापासून तालुक्यातील अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहे. (तालुका प्रतिनिधी)