शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात घनकचरा केंद्राचा अभाव

By admin | Updated: April 19, 2015 00:35 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

गावात कचऱ्याचे ढिग : आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह रंजित चिंचखेडे  चुल्हाडभंडारा : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु स्वच्छ गावाच्या भूमिकेसाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हा पॅटर्न भंडारा जिल्ह्यात अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा उपक्रम राबविताना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.देशात स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाचा मोठा भर आहे. शहर आणि गावांना या अभियानात जोडण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमात गावकरी सहभाग घेत आहे. उपक्रमाचा अनुभव गावकऱ्यांना आहे. यामुळे गावात स्वच्छता दिसून येत आहे. या उपक्रम अंतर्गत गावात कचरा कुंडी तयार करण्यात आली आहेत. कचरा कुंड्या तुडूंब भरलेल्या आहेत. ग्रामपंचायतमार्फत कचराकुंडी स्वच्छ करण्यात येत असले तरी या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट गावाच्या शेजारी करताना दुर्गंधीची भिती निर्माण होत आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात कचऱ्याची विल्हेवाट लावताना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. या परिसरातील नाले हे वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना जोडण्यात आली आहे. नाल्यात कचरा घातल्यास नद्यांचे पाणी आणि स्वच्छता दूषित होण्याची चिंता आहे. शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु बपेरा मार्गावर या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे तुमसरात दाखल होताना ये-जा करणाऱ्या नागरिकांचे स्वागत दुर्गंधीचे होत आहे. दरम्यान गावात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतांची निर्मिती करण्याचा पॅटर्न गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. २ ते ४ हजार लोकवस्तीच्या गावात घनकचरा वर्गिकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. गावाबाहेर शेड उभारण्यात आले असून विघटन आणि अविघटन असा कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. टाकावू कचऱ्यावर प्रक्रियेतून खत निर्मिती करण्याचा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जीर्ण नालीमुळे घाणच घाणगावात सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नालीचे बांधकाम १० ते १५ वर्षापुर्वी करण्यात आली आहेत. घरांचे नव्याने बांधकाम होत असल्याने या नाल्याची दिशा बदलली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावताना या नाल्या असमर्थ ठरत आहे. गावातील संपूर्ण पाण्याची विल्हेवाट लावणारी प्रमुख नाली मोठ्या नाल्यांला जोडणारी नाही. यामुळे पाणी गावातच मुरत आहे तर पावसाळ्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे.गावात कचऱ्यांची मोठी समस्या आहे. निधीअभावी स्वच्छता रखडली आहे. घनकचरा वर्गीकरण केंद्र प्रत्येक गावात निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. - छगनराव पारधी, सरपंच धनेगाव.गावातील कचऱ्यांची सातत्याने उचल करणारी साधने ग्रामपंचायतकडे नाहीत. यामुळे स्वच्छता प्रभावित होत आहे. - नेहा पटले, सदस्य ग्रामपंचायत चुल्हाड.