शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

ग्रामीण भागात घनकचरा केंद्राचा अभाव

By admin | Updated: April 19, 2015 00:35 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

गावात कचऱ्याचे ढिग : आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह रंजित चिंचखेडे  चुल्हाडभंडारा : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु स्वच्छ गावाच्या भूमिकेसाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हा पॅटर्न भंडारा जिल्ह्यात अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा उपक्रम राबविताना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.देशात स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाचा मोठा भर आहे. शहर आणि गावांना या अभियानात जोडण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमात गावकरी सहभाग घेत आहे. उपक्रमाचा अनुभव गावकऱ्यांना आहे. यामुळे गावात स्वच्छता दिसून येत आहे. या उपक्रम अंतर्गत गावात कचरा कुंडी तयार करण्यात आली आहेत. कचरा कुंड्या तुडूंब भरलेल्या आहेत. ग्रामपंचायतमार्फत कचराकुंडी स्वच्छ करण्यात येत असले तरी या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट गावाच्या शेजारी करताना दुर्गंधीची भिती निर्माण होत आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात कचऱ्याची विल्हेवाट लावताना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. या परिसरातील नाले हे वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना जोडण्यात आली आहे. नाल्यात कचरा घातल्यास नद्यांचे पाणी आणि स्वच्छता दूषित होण्याची चिंता आहे. शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु बपेरा मार्गावर या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे तुमसरात दाखल होताना ये-जा करणाऱ्या नागरिकांचे स्वागत दुर्गंधीचे होत आहे. दरम्यान गावात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतांची निर्मिती करण्याचा पॅटर्न गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. २ ते ४ हजार लोकवस्तीच्या गावात घनकचरा वर्गिकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. गावाबाहेर शेड उभारण्यात आले असून विघटन आणि अविघटन असा कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. टाकावू कचऱ्यावर प्रक्रियेतून खत निर्मिती करण्याचा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जीर्ण नालीमुळे घाणच घाणगावात सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नालीचे बांधकाम १० ते १५ वर्षापुर्वी करण्यात आली आहेत. घरांचे नव्याने बांधकाम होत असल्याने या नाल्याची दिशा बदलली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावताना या नाल्या असमर्थ ठरत आहे. गावातील संपूर्ण पाण्याची विल्हेवाट लावणारी प्रमुख नाली मोठ्या नाल्यांला जोडणारी नाही. यामुळे पाणी गावातच मुरत आहे तर पावसाळ्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे.गावात कचऱ्यांची मोठी समस्या आहे. निधीअभावी स्वच्छता रखडली आहे. घनकचरा वर्गीकरण केंद्र प्रत्येक गावात निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. - छगनराव पारधी, सरपंच धनेगाव.गावातील कचऱ्यांची सातत्याने उचल करणारी साधने ग्रामपंचायतकडे नाहीत. यामुळे स्वच्छता प्रभावित होत आहे. - नेहा पटले, सदस्य ग्रामपंचायत चुल्हाड.