शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

ग्रामीण भागात घनकचरा केंद्राचा अभाव

By admin | Updated: April 19, 2015 00:35 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

गावात कचऱ्याचे ढिग : आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह रंजित चिंचखेडे  चुल्हाडभंडारा : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु स्वच्छ गावाच्या भूमिकेसाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हा पॅटर्न भंडारा जिल्ह्यात अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा उपक्रम राबविताना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.देशात स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाचा मोठा भर आहे. शहर आणि गावांना या अभियानात जोडण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमात गावकरी सहभाग घेत आहे. उपक्रमाचा अनुभव गावकऱ्यांना आहे. यामुळे गावात स्वच्छता दिसून येत आहे. या उपक्रम अंतर्गत गावात कचरा कुंडी तयार करण्यात आली आहेत. कचरा कुंड्या तुडूंब भरलेल्या आहेत. ग्रामपंचायतमार्फत कचराकुंडी स्वच्छ करण्यात येत असले तरी या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट गावाच्या शेजारी करताना दुर्गंधीची भिती निर्माण होत आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात कचऱ्याची विल्हेवाट लावताना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. या परिसरातील नाले हे वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना जोडण्यात आली आहे. नाल्यात कचरा घातल्यास नद्यांचे पाणी आणि स्वच्छता दूषित होण्याची चिंता आहे. शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु बपेरा मार्गावर या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे तुमसरात दाखल होताना ये-जा करणाऱ्या नागरिकांचे स्वागत दुर्गंधीचे होत आहे. दरम्यान गावात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतांची निर्मिती करण्याचा पॅटर्न गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. २ ते ४ हजार लोकवस्तीच्या गावात घनकचरा वर्गिकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. गावाबाहेर शेड उभारण्यात आले असून विघटन आणि अविघटन असा कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. टाकावू कचऱ्यावर प्रक्रियेतून खत निर्मिती करण्याचा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जीर्ण नालीमुळे घाणच घाणगावात सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नालीचे बांधकाम १० ते १५ वर्षापुर्वी करण्यात आली आहेत. घरांचे नव्याने बांधकाम होत असल्याने या नाल्याची दिशा बदलली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावताना या नाल्या असमर्थ ठरत आहे. गावातील संपूर्ण पाण्याची विल्हेवाट लावणारी प्रमुख नाली मोठ्या नाल्यांला जोडणारी नाही. यामुळे पाणी गावातच मुरत आहे तर पावसाळ्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे.गावात कचऱ्यांची मोठी समस्या आहे. निधीअभावी स्वच्छता रखडली आहे. घनकचरा वर्गीकरण केंद्र प्रत्येक गावात निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. - छगनराव पारधी, सरपंच धनेगाव.गावातील कचऱ्यांची सातत्याने उचल करणारी साधने ग्रामपंचायतकडे नाहीत. यामुळे स्वच्छता प्रभावित होत आहे. - नेहा पटले, सदस्य ग्रामपंचायत चुल्हाड.