शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

निधीअभावी भटक्या जाती-जमातीच्या वसाहतीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : राज्यातील आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील भटक्या जाती- जमातीच्या वसाहतीचे निधीअभावी स्वप्न भंगले ...

चुल्हाड ( सिहोरा ) : राज्यातील आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील भटक्या जाती- जमातीच्या वसाहतीचे निधीअभावी स्वप्न भंगले असल्याचा आरोप भटक्या जाती- जमाती संघर्ष कृती समिती, तुमसर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

भंडारा जिल्ह्यातील भटके विमुक्त जाती- जमाती एनटीबी तथा धनगर समाज घरकुल योजना समाजकल्याण कार्यालय भंडारा येथे बॅनर लावून प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून भिंतीपुरतेच शोभेची ठेवले. मात्र, या बॅनरमध्ये भटक्या विमुक्त जाती- जमाती घरकुल योजनेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तीन वर्षांपासून भटक्या विमुक्त जाती-जमाती घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालय भंडारा येथे धूळखात पडून आहेत.

भंडारा जिल्ह्यातील भटक्या समाजाचा महाविकास आघाडी सरकारवर रोष व्यक्त होत आहे. भटक्या विमुक्त वंचित घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना राबविणुयाबाबत पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी ३१ ऑगस्टच्या सभेत दिलेल्या निर्देशाचे पालन करा, विजाभज इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय अनुषंगाने विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना राबविण्याबाबत लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेच्या ठरावाऐवजी ग्रामपंचायत मासिक सभेच्या ठरावासह परिपूर्ण प्रस्ताव १५ सप्टेंबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समीतीच्या मंजुरीकरिता जिल्हा व तालुक्यांतील घरकुलाच्या याद्या सज्ज असताना व भटक्या जाती-जमाती विमुक्तांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, प्रश्न कायमच आहे. महाआवास अभियान सर्वांना घर असले तरी स्वातंत्र्यकाळापासून भटक्या विमुक्त जाती- जमाती वंचित घटक घरकुल योजसाठी आजही वंचितच असल्याचे सांगितले जात आहे.

२४ जानेवारी २०१८ च्या परिपत्रकात देश स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटूनही अद्यापही भटक्या समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी, उत्पन्नस्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे त्यामुळे भटक्या जाती- जमाती विमुक्त जाती मूळ योजनेत सुधारणा करुन सदर योजना राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेच्या धर्तीवर, पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात यावा.

महाआवास अभियान ग्रामीण १०० दिवस घरकुल स्वप्नपूर्तीचे असले तरी महाराष्ट्र राज्य सरकार परिपत्रक संदर्भीय अनुषंगाने भटक्या विमुक्तांचे घरकुलाचे स्वप्न भंग केले, असा आरोप एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक जनार्दन खेडकर, धनगर कृती समिती भंडारा जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, भारतीय मच्छीमार समाज संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष सुनिता मोहनकर, माजी उपसरपंच मुनिराज मारबदे, एकलव्य सेना तुमसर तालुका मुख्य संघटक गणेश मेश्राम, एकलव्य सेना उपसंघटक, संघाटक दीपक मारबदे, संजु भुरे, संदीप मारबदे, मनोज केवट व जिल्ह्यातील भटक्या समाजाला भेडसावत असल्याचे दिसून येत आहे.