शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

निधीअभावी भटक्या जाती-जमातीच्या वसाहतीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : राज्यातील आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील भटक्या जाती- जमातीच्या वसाहतीचे निधीअभावी स्वप्न भंगले ...

चुल्हाड ( सिहोरा ) : राज्यातील आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील भटक्या जाती- जमातीच्या वसाहतीचे निधीअभावी स्वप्न भंगले असल्याचा आरोप भटक्या जाती- जमाती संघर्ष कृती समिती, तुमसर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

भंडारा जिल्ह्यातील भटके विमुक्त जाती- जमाती एनटीबी तथा धनगर समाज घरकुल योजना समाजकल्याण कार्यालय भंडारा येथे बॅनर लावून प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून भिंतीपुरतेच शोभेची ठेवले. मात्र, या बॅनरमध्ये भटक्या विमुक्त जाती- जमाती घरकुल योजनेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तीन वर्षांपासून भटक्या विमुक्त जाती-जमाती घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालय भंडारा येथे धूळखात पडून आहेत.

भंडारा जिल्ह्यातील भटक्या समाजाचा महाविकास आघाडी सरकारवर रोष व्यक्त होत आहे. भटक्या विमुक्त वंचित घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना राबविणुयाबाबत पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी ३१ ऑगस्टच्या सभेत दिलेल्या निर्देशाचे पालन करा, विजाभज इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय अनुषंगाने विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना राबविण्याबाबत लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेच्या ठरावाऐवजी ग्रामपंचायत मासिक सभेच्या ठरावासह परिपूर्ण प्रस्ताव १५ सप्टेंबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समीतीच्या मंजुरीकरिता जिल्हा व तालुक्यांतील घरकुलाच्या याद्या सज्ज असताना व भटक्या जाती-जमाती विमुक्तांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, प्रश्न कायमच आहे. महाआवास अभियान सर्वांना घर असले तरी स्वातंत्र्यकाळापासून भटक्या विमुक्त जाती- जमाती वंचित घटक घरकुल योजसाठी आजही वंचितच असल्याचे सांगितले जात आहे.

२४ जानेवारी २०१८ च्या परिपत्रकात देश स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटूनही अद्यापही भटक्या समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी, उत्पन्नस्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे त्यामुळे भटक्या जाती- जमाती विमुक्त जाती मूळ योजनेत सुधारणा करुन सदर योजना राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेच्या धर्तीवर, पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात यावा.

महाआवास अभियान ग्रामीण १०० दिवस घरकुल स्वप्नपूर्तीचे असले तरी महाराष्ट्र राज्य सरकार परिपत्रक संदर्भीय अनुषंगाने भटक्या विमुक्तांचे घरकुलाचे स्वप्न भंग केले, असा आरोप एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक जनार्दन खेडकर, धनगर कृती समिती भंडारा जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, भारतीय मच्छीमार समाज संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष सुनिता मोहनकर, माजी उपसरपंच मुनिराज मारबदे, एकलव्य सेना तुमसर तालुका मुख्य संघटक गणेश मेश्राम, एकलव्य सेना उपसंघटक, संघाटक दीपक मारबदे, संजु भुरे, संदीप मारबदे, मनोज केवट व जिल्ह्यातील भटक्या समाजाला भेडसावत असल्याचे दिसून येत आहे.