शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

लाखनीत मुलभूत सुविधांचा अभाव

By admin | Updated: August 18, 2014 23:19 IST

साकोली तालुक्यातून १ मे २००० मध्ये विभक्त झालेल्या लाखनी तालुक्याला १४ वर्षाचा कालावधी लोटला मात्र विकास रखडलेलाच आहे. मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुकावासीयांमध्ये असंतोष पसरला आहे.

लाखनी : साकोली तालुक्यातून १ मे २००० मध्ये विभक्त झालेल्या लाखनी तालुक्याला १४ वर्षाचा कालावधी लोटला मात्र विकास रखडलेलाच आहे. मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुकावासीयांमध्ये असंतोष पसरला आहे.लाखनी तालुक्यात अन्न, वस्त्र, निवारा आरोग्य शिक्षण या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. २५ हजार २४७ हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असूनसुद्धा धान पिकविणारा शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ १३ वर्षानंतरही विशेष सुविधा तालुक्यात नाहीत. ३६ हजार ६६८.७३ भौगोलिक क्षेत्र लाभलेल्या तालुक्याची लोकसंख्या १ लाख २२ हजार असून ७२ ग्रामपंचायती तालुका कार्यालये, पंचायत समिती कामे सांभाळत आहे. आरोग्य व शिक्षण या गरजा ग्रामीण जनतेपर्यंत पोहचू शकल्या नाहीत.आजही तालुक्यात कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू समस्या आहे. गरीबांच्या आरोग्य सेवेचे दरवाजे बंद झाले असून शासकीय रुग्णालये थातूर मातूर उपचाराचे केंद्र बनले आहणेत. तालुक्यात २ ग्रामीण रुग्णालये, ५ प्राथमिक आरोग्य केंद्र, २६ उपकेंद्र, ८ आयुर्वेदिक दवाखाने असून सुद्धा गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतो. गरीबांसाठी अब्जावधी रुपयाचा चुराडा शासनाने केला व रुग्णालये बांधली. मात्र तालुक्याची आरोग्य सेवा सलाईवर आहे हे नाकारता येत नाही. अपुरा कर्मचारी व अधिकारी वर्गामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. शिक्षणाची सुद्धा गंभीर अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या ६६ प्राथमिक शाळा, २३ उच्च माध्यमिक शाळा तर पाच उच्च माध्यमिक शाळा असून माध्यमिक शाळा असून सुद्धा खासगी शिक्षण संस्थांना शाळांची खैरात वाटण्यात आली.अवाजवी शिक्षण शुल्क आकारुन शिक्षण संस्थांनी सुविधेच्या नावावर लुटमार सुरु केली आहे. यातच कॉन्व्हेंट व सिबीएसई सारख्या पॅटर्नमुळे गरीब पाल्यांच्या शिक्षण महागले. शेती व्यवसाय प्रमुख असल्याने तालुक्यातील बळीराजा शेतीच्या मशागतीस विकास शोधत राहिला. लाखनी तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने स्पर्धा परीक्षेचे वातावरण नसल्याने बेरोजगारांना संधी मिळत नाही. भंडारा जिल्ह्यात मुंबई, दिल्ली हलवून सोडण्याची ताकद असणारे नेते आहेत. मात्र ५०० ते हजार मजुरांना काम मिळेल असा एकही उद्योग असून त्यात तालुक्यातील बेरोजगारांना स्थान नाही. उच्च शिक्षण घेणारे बेरोजगार युवक आजही २ ते ३ हजार रुपयाच्या नोकरीसाठी दारोदार फिरत आहेत. अनेक बेरोजगारांनी रोजगार मिळत नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करतात तर मोलमजूरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो बेरोजगाराचे लोंढे शहराकडे जात असल्याने गाव ओस पडत आहेत. लाखनी तालुक्यात लघु प्रकल्प व शेकडो मामा तलाव असून सुद्धा तालुका सिंचनाविना तहानलेलाच आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून नव्हे तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. ही तालुक्याची विदारक स्थिती मताचा जोगवा मागणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना का दिसत नाही. कोणत्याही क्षेत्राच्या विकासात रस्ते हा महत्वाचा घटक परंतु आजही तालुक्यात अनेक गावात जायला धड रस्ते नाहीत त्या विकास खुंटलेला आहे. लाखनी तालुक्यात अनेक शेतात जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या पांदण रस्त्यावरुन जाताना सोळाव्या शतकाचे दर्शन होते. रस्ते नाही, वीज नाही, शिक्षण आरोग्याच्या सोयी नाही. रोजगार तर दूर राहिला. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या नावावर विकासाच्या योजनाचा मध्यंतरी कोल्हे गडप करू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयाचा निधी खर्च झाल्याचे दाखविले जाते. मात्र समस्या जैसे थे आहे. त्यामुळे देशाचा गाभा असलेला शेती व शेतकरी या घटकाला विसरुन चालणार नाही. हे नेत्यांना आज सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)