शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ६९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:54 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा जावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या आकडेवारीवर नजर फेरल्यास जिल्हा प्रशासनाचा हा जावईशोध शेतकºयांना तारणार काय? असा उपरोधिक सवाल आपसुकच निर्माण झाला आहे.महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकºयांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासूनच कमी पर्जन्यमानामुळे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी करीत आहेत.जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची नजरअंदाज हंगामी आणेवारी ६९ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावाचा समावेश नाही, हे येथे उल्लेखनीय. टेबलवर बसून आकडेवारी तयार करण्यात आली काय? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतात पाणीची पडले नाही तर धान्य कसे उगवणार मग आमच्या क्षेत्राची आणेवारेी जास्त कशी? गव्हाससोबत सोंड्या दळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे, असेही श्ेतकरी बोलत असताना त्ळांची दखल घेण्यात आलेली नाही. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६८ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६३ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७१ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७६ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६१ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७१ पैसे दाखविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने धानपिकाची योग्य चौकशी करून दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाºया अंतिम आणेवारीत शेतकºयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा केली आहे.प्रकल्पाच्या पाण्यासाठी टाहोमागील दशकापासून जिल्ह्याला नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणी लांबणीवर गेली. शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक करपले. जलाशयात पाणी असून त्याचा फायदा शेतकºयांना मिळाला नाही. मिळेल त्या साधनाने पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न शेतकºयांनी केला. धान निसव्यावर पाण्याची कमतरता आणि धानपिकावर किडींचा वाढता प्रादुर्भावामुळे धान्याच्या लोंबा भरलेल्या नाहीत. दुसरीकडे प्रकल्पांचे पाणी मिळत नसल्याने सुल्तानी संकटही कायम आहे. आधीच धानाला हमीभाव नसताना दुसरीकडे उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.