शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ६९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:54 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा जावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या आकडेवारीवर नजर फेरल्यास जिल्हा प्रशासनाचा हा जावईशोध शेतकºयांना तारणार काय? असा उपरोधिक सवाल आपसुकच निर्माण झाला आहे.महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकºयांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासूनच कमी पर्जन्यमानामुळे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी करीत आहेत.जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची नजरअंदाज हंगामी आणेवारी ६९ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावाचा समावेश नाही, हे येथे उल्लेखनीय. टेबलवर बसून आकडेवारी तयार करण्यात आली काय? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतात पाणीची पडले नाही तर धान्य कसे उगवणार मग आमच्या क्षेत्राची आणेवारेी जास्त कशी? गव्हाससोबत सोंड्या दळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे, असेही श्ेतकरी बोलत असताना त्ळांची दखल घेण्यात आलेली नाही. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६८ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६३ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७१ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७६ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६१ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७१ पैसे दाखविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने धानपिकाची योग्य चौकशी करून दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाºया अंतिम आणेवारीत शेतकºयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा केली आहे.प्रकल्पाच्या पाण्यासाठी टाहोमागील दशकापासून जिल्ह्याला नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणी लांबणीवर गेली. शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक करपले. जलाशयात पाणी असून त्याचा फायदा शेतकºयांना मिळाला नाही. मिळेल त्या साधनाने पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न शेतकºयांनी केला. धान निसव्यावर पाण्याची कमतरता आणि धानपिकावर किडींचा वाढता प्रादुर्भावामुळे धान्याच्या लोंबा भरलेल्या नाहीत. दुसरीकडे प्रकल्पांचे पाणी मिळत नसल्याने सुल्तानी संकटही कायम आहे. आधीच धानाला हमीभाव नसताना दुसरीकडे उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.