शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ६९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:54 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा जावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या आकडेवारीवर नजर फेरल्यास जिल्हा प्रशासनाचा हा जावईशोध शेतकºयांना तारणार काय? असा उपरोधिक सवाल आपसुकच निर्माण झाला आहे.महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकºयांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासूनच कमी पर्जन्यमानामुळे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी करीत आहेत.जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची नजरअंदाज हंगामी आणेवारी ६९ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावाचा समावेश नाही, हे येथे उल्लेखनीय. टेबलवर बसून आकडेवारी तयार करण्यात आली काय? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतात पाणीची पडले नाही तर धान्य कसे उगवणार मग आमच्या क्षेत्राची आणेवारेी जास्त कशी? गव्हाससोबत सोंड्या दळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे, असेही श्ेतकरी बोलत असताना त्ळांची दखल घेण्यात आलेली नाही. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६८ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६३ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७१ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७६ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६१ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७१ पैसे दाखविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने धानपिकाची योग्य चौकशी करून दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाºया अंतिम आणेवारीत शेतकºयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा केली आहे.प्रकल्पाच्या पाण्यासाठी टाहोमागील दशकापासून जिल्ह्याला नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणी लांबणीवर गेली. शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक करपले. जलाशयात पाणी असून त्याचा फायदा शेतकºयांना मिळाला नाही. मिळेल त्या साधनाने पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न शेतकºयांनी केला. धान निसव्यावर पाण्याची कमतरता आणि धानपिकावर किडींचा वाढता प्रादुर्भावामुळे धान्याच्या लोंबा भरलेल्या नाहीत. दुसरीकडे प्रकल्पांचे पाणी मिळत नसल्याने सुल्तानी संकटही कायम आहे. आधीच धानाला हमीभाव नसताना दुसरीकडे उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.