भंडारा : ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी ऑनलाईन घोषित करण्यात आला. यामध्ये जवाहरनगर येथील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी मनश्री श्रीवास्तव हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिला ९४.८0 टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी अक्षय अग्रवाल याने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. त्याला ८९ टक्के गुण मिळाले आहेत. याच शाळेचा अनुज प्रजापती हा जिल्ह्यातून द्वितीय ८८.२ टक्के, स्वप्नील सिंदीमेश्राम याला ७९.८ टक्के, बिमोर मेश्राम ७७.६ टक्के, काजल गोस्वामी ७४.४ टक्के, अमन रामटेके ७३ टक्के, अंकिता जयस्वाल ७३ टक्के गुण प्राप्त केले. जिल्ह्यात चार शाळा भंडारा जिल्ह्यात ‘सीबीएसई’ पॅटर्नच्या बारावीच्या चार शाळा असून त्यात महर्षी विद्या मंदिर भंडारा, केंद्रीय विद्यालय जवाहरनगर, सनफ्लॅग विद्यालय आणि शिरीन नेत्रावाला तुमसर या शाळांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
केंद्रीय विद्यालयाची मनश्री जिल्ह्यात ‘टॉपर’
By admin | Updated: May 27, 2014 00:32 IST