शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जिल्ह्याची प्रतिमा अबाधित ठेवा

By admin | Updated: March 26, 2015 00:28 IST

सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत.

भंडारा : सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत. त्यामुळे या माध्यमाचा वापर जपुन केला पाहिजे. जिल्ह्याची प्रतिमा डागाळली जाईल, असे कोणतेही कृत्य सोशल मिडियाच्या वापरातून करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कयम राहावी म्हणून जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, कार्यकारी अभियंता गाणार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, तहसिलदार सुशांत बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती निंबोरकर, महेंद्र गडकरी, डॉ. जुल्फी शेख, राम चाचेर उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सोशल मिडियांचा वापराबाबत जनजागृती करण्यात येईल. मात्र पालकांनी सुद्धा याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना समाजाला, राज्याला आणि राष्ट्राला धोका होणार नाही, अशा पद्धतीने करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वत:च्या धर्माला चांगले समजावे पण दुसऱ्याच्या धर्माला व जातीला कमी लेखू नका. प्रसारमाध्यांनी सुद्धा घटनेच्या दोन्ही बाजू द्याव्यात, शांतता राखण्यासाठी प्रशासनाने काय काम केले ते सुद्धा लोकांपर्यंत पोहचायला हवे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ हे रद्द केल्याने सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांना खुप आनंद झाला असेल. पण या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही त्याला बंधन घातली गेली पाहिजेत. त्यासाठी आय.पी.सी. अ‍ॅक्ट आहे. या कायद्यानुसार सुद्धा संबंधितावर कार्यवाही करता येवू शकते. जिल्ह्याची ओळख खैरलांजी, मुरमाडी, अशी झाली आहे. ती बदलण्याचे आवाहन आपल्यासमोर असताना आपण बेजबाबदारपणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी जातीय सलोखा समितीची भूमिका विषद केली तर उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)समितीच्या सदस्यांनी मांडले विचारबैठकीत राम चाचेरे यांनी सोशल मिडियावर विस्फोटक मजकुर टाकू नये. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि मिरवणुकांमध्ये डी.जे. ऐवजी ढोल ताशाचा वापर करावा अशा सूचना केल्यात. प्रा. डॉ. जुल्फी शेख यांनी सायबर क्राईम विषयी तरूणांना संस्कार देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. हाजी अब्दुल गफ्फार आकबानी यांनी दुसऱ्यांच्या जाती, धर्माचा सन्मान करायला हवा. इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच कायदा हातात न घेता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महेंद्र गडकरी, ज्योती निंभोरकर यांनीही सुचना केल्यात.