शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची प्रतिमा अबाधित ठेवा

By admin | Updated: March 26, 2015 00:28 IST

सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत.

भंडारा : सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत. त्यामुळे या माध्यमाचा वापर जपुन केला पाहिजे. जिल्ह्याची प्रतिमा डागाळली जाईल, असे कोणतेही कृत्य सोशल मिडियाच्या वापरातून करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कयम राहावी म्हणून जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, कार्यकारी अभियंता गाणार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, तहसिलदार सुशांत बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती निंबोरकर, महेंद्र गडकरी, डॉ. जुल्फी शेख, राम चाचेर उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सोशल मिडियांचा वापराबाबत जनजागृती करण्यात येईल. मात्र पालकांनी सुद्धा याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना समाजाला, राज्याला आणि राष्ट्राला धोका होणार नाही, अशा पद्धतीने करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वत:च्या धर्माला चांगले समजावे पण दुसऱ्याच्या धर्माला व जातीला कमी लेखू नका. प्रसारमाध्यांनी सुद्धा घटनेच्या दोन्ही बाजू द्याव्यात, शांतता राखण्यासाठी प्रशासनाने काय काम केले ते सुद्धा लोकांपर्यंत पोहचायला हवे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ हे रद्द केल्याने सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांना खुप आनंद झाला असेल. पण या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही त्याला बंधन घातली गेली पाहिजेत. त्यासाठी आय.पी.सी. अ‍ॅक्ट आहे. या कायद्यानुसार सुद्धा संबंधितावर कार्यवाही करता येवू शकते. जिल्ह्याची ओळख खैरलांजी, मुरमाडी, अशी झाली आहे. ती बदलण्याचे आवाहन आपल्यासमोर असताना आपण बेजबाबदारपणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी जातीय सलोखा समितीची भूमिका विषद केली तर उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)समितीच्या सदस्यांनी मांडले विचारबैठकीत राम चाचेरे यांनी सोशल मिडियावर विस्फोटक मजकुर टाकू नये. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि मिरवणुकांमध्ये डी.जे. ऐवजी ढोल ताशाचा वापर करावा अशा सूचना केल्यात. प्रा. डॉ. जुल्फी शेख यांनी सायबर क्राईम विषयी तरूणांना संस्कार देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. हाजी अब्दुल गफ्फार आकबानी यांनी दुसऱ्यांच्या जाती, धर्माचा सन्मान करायला हवा. इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच कायदा हातात न घेता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महेंद्र गडकरी, ज्योती निंभोरकर यांनीही सुचना केल्यात.