शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

जिल्ह्याची प्रतिमा अबाधित ठेवा

By admin | Updated: March 26, 2015 00:28 IST

सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत.

भंडारा : सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत. त्यामुळे या माध्यमाचा वापर जपुन केला पाहिजे. जिल्ह्याची प्रतिमा डागाळली जाईल, असे कोणतेही कृत्य सोशल मिडियाच्या वापरातून करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कयम राहावी म्हणून जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, कार्यकारी अभियंता गाणार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, तहसिलदार सुशांत बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती निंबोरकर, महेंद्र गडकरी, डॉ. जुल्फी शेख, राम चाचेर उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सोशल मिडियांचा वापराबाबत जनजागृती करण्यात येईल. मात्र पालकांनी सुद्धा याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना समाजाला, राज्याला आणि राष्ट्राला धोका होणार नाही, अशा पद्धतीने करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वत:च्या धर्माला चांगले समजावे पण दुसऱ्याच्या धर्माला व जातीला कमी लेखू नका. प्रसारमाध्यांनी सुद्धा घटनेच्या दोन्ही बाजू द्याव्यात, शांतता राखण्यासाठी प्रशासनाने काय काम केले ते सुद्धा लोकांपर्यंत पोहचायला हवे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ हे रद्द केल्याने सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांना खुप आनंद झाला असेल. पण या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही त्याला बंधन घातली गेली पाहिजेत. त्यासाठी आय.पी.सी. अ‍ॅक्ट आहे. या कायद्यानुसार सुद्धा संबंधितावर कार्यवाही करता येवू शकते. जिल्ह्याची ओळख खैरलांजी, मुरमाडी, अशी झाली आहे. ती बदलण्याचे आवाहन आपल्यासमोर असताना आपण बेजबाबदारपणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी जातीय सलोखा समितीची भूमिका विषद केली तर उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)समितीच्या सदस्यांनी मांडले विचारबैठकीत राम चाचेरे यांनी सोशल मिडियावर विस्फोटक मजकुर टाकू नये. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि मिरवणुकांमध्ये डी.जे. ऐवजी ढोल ताशाचा वापर करावा अशा सूचना केल्यात. प्रा. डॉ. जुल्फी शेख यांनी सायबर क्राईम विषयी तरूणांना संस्कार देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. हाजी अब्दुल गफ्फार आकबानी यांनी दुसऱ्यांच्या जाती, धर्माचा सन्मान करायला हवा. इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच कायदा हातात न घेता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महेंद्र गडकरी, ज्योती निंभोरकर यांनीही सुचना केल्यात.